शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

पारा चढताच लिंबाचा तोरा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST

अविनाश कदम आष्टी : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने लिंबू आता चांगलाच भाव खात आहे. गेल्या १५ दिवसांत लिंबाच्या ...

अविनाश कदम

आष्टी : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने लिंबू आता चांगलाच भाव खात आहे. गेल्या १५ दिवसांत लिंबाच्या दरात दुप्पट वाढ झाली असून लिंबाची मागणीदेखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र, अशा परिस्थितीत लिंबाची आवक घटली असून, लिंबाचे दर दुपटीने वधारले आहेत. काही दिवसांपूर्वी ४० रुपये किलो असणाऱ्या लिंबाने ९० रुपये किलोचा टप्पा ओलांडला आहे.

सी जीवनसत्व असणाऱ्या लिंबाचा खाद्यपदार्थांसह औषधांसाठी वापर होतो. कोरोनासह इतर अनेक आजार रोखण्यासाठी लिंबू आरोग्यवर्धक आहे. लिंबाला चांगला भाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात लिंबू लागवडीसह व्यवसायाकडे वळल्याचे दिसत आहे. मागील महिन्यापासून तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्याने लाहीलाही होणाऱ्या शरीराला थंडावा देण्यासाठी व ऊर्जा टिकविण्यासाठी लिंबाचे सरबत जास्त प्रमाणात लोक घेत आहेत. विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी देखील डिकाशन चहा पिण्यावर नागरिकांचा भर असून यामध्ये लिंबाचा वापर केला जातो. उसाचा रस काढतानादेखील लिंबाचा वापर केला जातो. सध्या आवक घटत चालली असून मागणी जास्त असल्याने लिंबाच्या वाढत्या किमतीने सर्वांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. लिंबाचे भाव वाढल्याने उसाच्या रसाचे भावही वाढले असून मागील वर्षी १० रुपयाला मिळणाऱ्या रसाच्या ग्लाससाठी आता १५ रुपये मोजावे लागतात. तसेच लिंबू सरबताचे भाव वाढले आहेत. हॉटेलमधील प्लेटमधूनही लिंबू गायब होऊ लागले आहे. एप्रिल महिन्यात लिंबाचे दर ९० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे मे व त्यापुढील महिन्यात काय होणार, असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे.

उन्हळ्यापर्यंत भाव चढेच राहणार

सध्या लिंबाचे भाव वाढले आहेत. लिंबाची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. जुलै ते जानेवारीपर्यंत ३ ते ४ टन आवक आमच्याकडे होत असते. आता फक्त १ टनाच्या आसपास लिंबाची आवक होत आहे. उन्हाळ्यामुळे लिंबाची वाढती मागणी पाहता व आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे. उन्हाळा संपेपर्यंत तरी लिंबाचे दर असेच चढे राहतील.

- गणेश चौधरी, लिंबाचे ठोक व्यापारी, आष्टी.

===Photopath===

030421\img-20210403-wa0324_14.jpg