शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार ,पोलीस, मुख्याधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:35 IST

माजलगाव : कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना तहसीलदार, पोलीस व मुख्याधिकाऱ्यात समन्वयाचा अभाव असल्याने शहरात कोणाचा कोणाला ...

माजलगाव : कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना तहसीलदार, पोलीस व मुख्याधिकाऱ्यात समन्वयाचा अभाव असल्याने शहरात कोणाचा कोणाला मेळ लागत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून ॲन्टिजेन टेस्ट न करता बिनधास्तपणे दुकाने उघडी असून नागरिक दिवसभर विनामस्क फिरत आहेत. त्यांच्यावर कोणाचाच अंकुश राहिलेला नसून हे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतांना दिसत आहेत.

सध्या बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून माजलगाव तालुक्यातही या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या दहा दिवसांचा लॉकडाऊन सुरू असून या काळात मोठ्या प्रमाणावर निर्बंध लावण्यात आले आहेत. ॲन्टिजेन टेस्ट न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तसेच रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांवर नगरपालिकेच्या नेमलेल्या पथकाने कारवाया करणे आवश्यक असतांना ८-१० दिवसांत एखाददुसरी थातुरमातुर कारवाई केली जात आहे. यावर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा अंकुश दिसून येत नाही. दुकाने नियमानुसार वेळीच बंद करणे आवश्यक असतांना व दिवसभर रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे आवश्यक असतांना पोलीस मात्र नगरपालिकेच्या नावाने ओरडताना दिसत आहेत. तर येथील तहसीलदारांकडे माजलगावसह वडवणीचा पदभार असल्याने या ठिकाणी तहसीलदार आहेत की नाही हेच कळेना. तहसीलदार, पोलीस विभाग व मुख्याधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत असल्याने लॉकडाऊनच्या काळात शहरात लॉकडाऊन आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विनामास्क फिरणारे नागरिक, कारवाया न होणे, शिथील वेळेनंतरही उशिरापर्यंत दुकाने उघडी राहणे या बाबतीत विचारणा केली असता संबंधित विभागाला कळवण्यात येईल असे ठरावीक उत्तर देत तहसीलदार टाळाटाळ करताना दिसत आहेत.

नगरपालिकेने पथक नेमलेले असताना ते रस्त्यावर नाहीत. पोलिसांची संख्या कमी असताना होमगार्डना सोबत घेऊन केवळ पोलीसच रस्त्यावर आहेत. नगर परिषदेने नेमलेल्या पथकाबाबत मुख्याधिकाऱ्यांना कळविले जाईल.

--धनंजय फराटे ,पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे.