शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

शुद्ध भावनेतून कर्म म्हणजे भक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 11:54 PM

निर्गुण निराकार भगवंत परमात्मा आपलासा करण्यासाठी भक्तीचे अनेक मार्ग शास्त्राने सांगितले आहेत. वास्तविक माणूस जे कर्म करतो तीच भक्ती असते. भगवंत भक्तिमार्ग वेगवेगळा आहे; पण मनुष्य जे प्रत्येक कर्म करतो ते कर्म शुध्द भावनेने केले पाहिजे. असे प्रत्येक कर्म भक्ती ठरते, असे मौलिक विचार राष्ट्रीय कीर्तनकार तथा कीर्तन महोत्सवाचे संयोजक भरतबुवा रामदासी महाराजांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देभरतबुवा रामदासी यांचे प्रतिपादनबीडमध्ये राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : निर्गुण निराकार भगवंत परमात्मा आपलासा करण्यासाठी भक्तीचे अनेक मार्ग शास्त्राने सांगितले आहेत. वास्तविक माणूस जे कर्म करतो तीच भक्ती असते. भगवंत भक्तिमार्ग वेगवेगळा आहे; पण मनुष्य जे प्रत्येक कर्म करतो ते कर्म शुध्द भावनेने केले पाहिजे. असे प्रत्येक कर्म भक्ती ठरते, असे मौलिक विचार राष्ट्रीय कीर्तनकार तथा कीर्तन महोत्सवाचे संयोजक भरतबुवा रामदासी महाराजांनी व्यक्त केले.

बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे सोमवारी रोजी राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी महाराजांचे सांप्रदायिक कीर्तन झाले. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे त्यांनी निरूपण केले. प्रारंभी महाराजांचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, सचिव सुशील खटोड, लक्ष्मीनारायण पटेल, सुशील देशमुख आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कीर्तनाला वाघीरा फाटा येथील ज्ञानेश्वर अध्यात्म संगीत विद्यालयाच्या बाल टाळकºयांनी, तसेच पखवाजावर तालमणी केशव महाराज जगदाळे यांनी, पेटीवर सुधीर देशमुख यांनी साथसंगत केली. बिभीषण महाराज कोकाटे यांनी भजनाचे गायन केले.

कीर्तनरूपी सेवेतून परमेश्वर कुणी बघितला, असा प्रश्न करत रामदासी महाराज म्हणाले, माणसे सोशल मीडियावरून एकमेकांना खूप मार्मिक सुविचार पाठवतात; पण त्या विचारांना कृतीची जोड किती जण देतात हा खरा चिंतनाचा विषय आहे. परमेश्वर ही बघण्याची गोष्टच नाही, हे सांगताना उपनिषदातील दाखला त्यांनी दिला. वाणी, मन, डोळे, शब्दाच्या पलिकडे परमेश्वराचे अस्तित्व आहे. कीर्तन हे विनोदातील नसू नये. तितक्यापुरतेच स्थान विनोदाला कीर्तनात असावे असेही ते म्हणाले. प्रेम ही भावाची पहिली अवस्था आहे. भाव नसेल तर ती भक्तीच ठरत नाही. त्यामुळे कर्म कोणतेही करा, त्यात निष्ठा, प्रेम असायला हवे, हेच तत्त्वज्ञान संतांनी सांगीतले आहे. प्रेमाचे स्वरु प शब्दात व्यक्त करता येत नाही. इतके प्रेम व्यापक आहे. सूत्रसंचालन सुरेश साळुंके यांनी केले.

साधनेची गरज : श्रद्धा, संयम महत्त्वाचाजन्माला आलेल्या प्रत्येकाला भगवंत प्राप्तीचा अधिकार आहे. देव मिळायला काही करावे लागत नाही, तर काम, क्र ोध, लोभ, मोह, या विकारांना सोडून भगवंत साधना करावी लागते. अध्यात्मात श्रध्दा व संयमाला खूप महत्व असते. श्रद्धा ठेवणा-यांचा ज्ञान मिळू शकते भगवंत भक्ताचा प्रेमभाव पाहतो, असेही भरतबुवा रामदासी महाराज म्हणाले.