शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

झटपट सोयाबीन; भाव वाढल्याने शेतकऱ्यांचा वाढला कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कापूस हे सर्वाधिक क्षेत्रावर घेण्यात येणारे जिल्ह्यातील पीक होते. मात्र, मागील काही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात कापूस हे सर्वाधिक क्षेत्रावर घेण्यात येणारे जिल्ह्यातील पीक होते. मात्र, मागील काही वर्षांत कापसाचे उत्पन्न व त्या तुलनेत होणारा खर्च जास्त असल्यामुळे व सोयाबीनच्या दरात वाढ होत असल्याने, शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पिकाकडे वाढत असून, क्षेत्रदेखील वाढले आहे. मात्र, या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे उतारा कमी येण्याची शक्यता आहे.

काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील शेतकरी कापसाचा अधिक पेरा करीत होते. परंतु, बोंडअळीमुळे कापूस पिकांतून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न हाती मिळत नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. चालू वर्षात जवळपास ३ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. कमी वेळात सोयाबीन उत्पादन देणारे बियाणे बाजारपेठेत दाखल झाले आहेत. त्यामुळे अनेकांचा कल या कमी कालावधीत येणाऱ्या सोयाबीनकडे आहे. विशेष म्हणजे यंदा सोयाबीनला बाजारपेठेत १० ते ११ हजार रुपयांचा सरासरी दर मिळत आहे. या दरामध्ये पुढील काही कालावधीत वाढ होण्याची शक्यता जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी व व्यापारी व्यक्त करीत आहेत.

...

झटपट येणारे सोयाबीन

सोयाबीनचे ८० ते ९० दिवसांत उत्पादन देणारे काही बियाणे जिल्ह्यात उपलब्ध आहेत. अनेक शेतकरी या बियाण्यांची ट्रॅक्टरद्वारे पेरणी करतात. तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने कमी वेळेत उत्पादन मिळते.

..

मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन

जिल्ह्यातील बाजारपेठेत १०० ते १०५ दिवसांमध्ये उत्पादन देणारेही बियाणे आहेत. जमीन आणि पाण्याची उपलब्धता पाहून या बियाण्यांची पेरणी केली जाते. शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत.

..................

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन

११० दिवसांच्या पुढे येणारे बियाणे हे टोकन पद्धतीने पेरले जाते. त्यामुळे कमी बियाण्यांमध्ये अधिक उत्पादन मिळते. अधिक काळ जोपासना केल्याने झाडांचा आकार आणि उंची वाढून उत्पादनही वाढताना दिसते.

..........

शेतकरी म्हणतात...

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतून उत्पादन मिळत नाही. कापसाचा खर्च जास्त आहे. त्या तुलनेत भाव कमी मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनकडे शेतकरी वळले आहेत. दरवर्षी सोयाबीनचा सरासरी दर चांगला मिळत आहे.

- विठ्ठल जाडकर

...

जिल्ह्यात यापूर्वी कापसाचा पेरा अधिक होत होता; परंतु, बोंडअळीमुळे नुकसान झाले. त्यात इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढला; त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरण्यावर भर असून, सोयाबीननंतर दुसरे पीकदेखील घेता येते. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पर्याय घेतला.

- नितीन खंडागळे.

...

कृषी अधीक्षक म्हणतात

जिल्ह्यात कापूस सर्वाधिक क्षेत्रावर घेतला जात होता. मात्र, कापसाचे क्षेत्र या वर्षी घटले आहे. सरासरीच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा वाढला आहे. क्षेत्र वाढण्यामागे अनेक कारणे असून, कमी कालावधीत येणारे पीक हे एक कारण आहे.

- बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड.

...

गत पाच वर्षांत मिळालेले दर

वर्ष क्विंटलमध्ये दर

२०१७ ३२०० ते ४०००

२०१८ ३४०० ते ४५००

२०१९ ३८०० ते ५०००

२०२० ३००० ते ९०००

२०२१ १००० ते ११०० (अंदाजे).