शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

झटपट सोयाबीन; भाव वाढल्याने शेतकऱ्यांचा वाढला कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कापूस हे सर्वाधिक क्षेत्रावर घेण्यात येणारे जिल्ह्यातील पीक होते. मात्र, मागील काही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात कापूस हे सर्वाधिक क्षेत्रावर घेण्यात येणारे जिल्ह्यातील पीक होते. मात्र, मागील काही वर्षांत कापसाचे उत्पन्न व त्या तुलनेत होणारा खर्च जास्त असल्यामुळे व सोयाबीनच्या दरात वाढ होत असल्याने, शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पिकाकडे वाढत असून, क्षेत्रदेखील वाढले आहे. मात्र, या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे उतारा कमी येण्याची शक्यता आहे.

काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील शेतकरी कापसाचा अधिक पेरा करीत होते. परंतु, बोंडअळीमुळे कापूस पिकांतून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न हाती मिळत नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. चालू वर्षात जवळपास ३ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. कमी वेळात सोयाबीन उत्पादन देणारे बियाणे बाजारपेठेत दाखल झाले आहेत. त्यामुळे अनेकांचा कल या कमी कालावधीत येणाऱ्या सोयाबीनकडे आहे. विशेष म्हणजे यंदा सोयाबीनला बाजारपेठेत १० ते ११ हजार रुपयांचा सरासरी दर मिळत आहे. या दरामध्ये पुढील काही कालावधीत वाढ होण्याची शक्यता जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी व व्यापारी व्यक्त करीत आहेत.

...

झटपट येणारे सोयाबीन

सोयाबीनचे ८० ते ९० दिवसांत उत्पादन देणारे काही बियाणे जिल्ह्यात उपलब्ध आहेत. अनेक शेतकरी या बियाण्यांची ट्रॅक्टरद्वारे पेरणी करतात. तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने कमी वेळेत उत्पादन मिळते.

..

मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन

जिल्ह्यातील बाजारपेठेत १०० ते १०५ दिवसांमध्ये उत्पादन देणारेही बियाणे आहेत. जमीन आणि पाण्याची उपलब्धता पाहून या बियाण्यांची पेरणी केली जाते. शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत.

..................

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन

११० दिवसांच्या पुढे येणारे बियाणे हे टोकन पद्धतीने पेरले जाते. त्यामुळे कमी बियाण्यांमध्ये अधिक उत्पादन मिळते. अधिक काळ जोपासना केल्याने झाडांचा आकार आणि उंची वाढून उत्पादनही वाढताना दिसते.

..........

शेतकरी म्हणतात...

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतून उत्पादन मिळत नाही. कापसाचा खर्च जास्त आहे. त्या तुलनेत भाव कमी मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनकडे शेतकरी वळले आहेत. दरवर्षी सोयाबीनचा सरासरी दर चांगला मिळत आहे.

- विठ्ठल जाडकर

...

जिल्ह्यात यापूर्वी कापसाचा पेरा अधिक होत होता; परंतु, बोंडअळीमुळे नुकसान झाले. त्यात इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढला; त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरण्यावर भर असून, सोयाबीननंतर दुसरे पीकदेखील घेता येते. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पर्याय घेतला.

- नितीन खंडागळे.

...

कृषी अधीक्षक म्हणतात

जिल्ह्यात कापूस सर्वाधिक क्षेत्रावर घेतला जात होता. मात्र, कापसाचे क्षेत्र या वर्षी घटले आहे. सरासरीच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा वाढला आहे. क्षेत्र वाढण्यामागे अनेक कारणे असून, कमी कालावधीत येणारे पीक हे एक कारण आहे.

- बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड.

...

गत पाच वर्षांत मिळालेले दर

वर्ष क्विंटलमध्ये दर

२०१७ ३२०० ते ४०००

२०१८ ३४०० ते ४५००

२०१९ ३८०० ते ५०००

२०२० ३००० ते ९०००

२०२१ १००० ते ११०० (अंदाजे).