शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
2
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
3
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
4
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
5
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
6
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
7
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
8
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
9
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
10
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
11
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
12
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
13
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
14
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
15
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
17
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
18
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
19
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
20
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर

झटपट सोयाबीन; भाव वाढल्याने शेतकऱ्यांचा वाढला कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कापूस हे सर्वाधिक क्षेत्रावर घेण्यात येणारे जिल्ह्यातील पीक होते. मात्र, मागील काही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात कापूस हे सर्वाधिक क्षेत्रावर घेण्यात येणारे जिल्ह्यातील पीक होते. मात्र, मागील काही वर्षांत कापसाचे उत्पन्न व त्या तुलनेत होणारा खर्च जास्त असल्यामुळे व सोयाबीनच्या दरात वाढ होत असल्याने, शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पिकाकडे वाढत असून, क्षेत्रदेखील वाढले आहे. मात्र, या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे उतारा कमी येण्याची शक्यता आहे.

काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील शेतकरी कापसाचा अधिक पेरा करीत होते. परंतु, बोंडअळीमुळे कापूस पिकांतून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न हाती मिळत नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. चालू वर्षात जवळपास ३ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. कमी वेळात सोयाबीन उत्पादन देणारे बियाणे बाजारपेठेत दाखल झाले आहेत. त्यामुळे अनेकांचा कल या कमी कालावधीत येणाऱ्या सोयाबीनकडे आहे. विशेष म्हणजे यंदा सोयाबीनला बाजारपेठेत १० ते ११ हजार रुपयांचा सरासरी दर मिळत आहे. या दरामध्ये पुढील काही कालावधीत वाढ होण्याची शक्यता जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी व व्यापारी व्यक्त करीत आहेत.

...

झटपट येणारे सोयाबीन

सोयाबीनचे ८० ते ९० दिवसांत उत्पादन देणारे काही बियाणे जिल्ह्यात उपलब्ध आहेत. अनेक शेतकरी या बियाण्यांची ट्रॅक्टरद्वारे पेरणी करतात. तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने कमी वेळेत उत्पादन मिळते.

..

मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन

जिल्ह्यातील बाजारपेठेत १०० ते १०५ दिवसांमध्ये उत्पादन देणारेही बियाणे आहेत. जमीन आणि पाण्याची उपलब्धता पाहून या बियाण्यांची पेरणी केली जाते. शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत.

..................

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन

११० दिवसांच्या पुढे येणारे बियाणे हे टोकन पद्धतीने पेरले जाते. त्यामुळे कमी बियाण्यांमध्ये अधिक उत्पादन मिळते. अधिक काळ जोपासना केल्याने झाडांचा आकार आणि उंची वाढून उत्पादनही वाढताना दिसते.

..........

शेतकरी म्हणतात...

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतून उत्पादन मिळत नाही. कापसाचा खर्च जास्त आहे. त्या तुलनेत भाव कमी मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनकडे शेतकरी वळले आहेत. दरवर्षी सोयाबीनचा सरासरी दर चांगला मिळत आहे.

- विठ्ठल जाडकर

...

जिल्ह्यात यापूर्वी कापसाचा पेरा अधिक होत होता; परंतु, बोंडअळीमुळे नुकसान झाले. त्यात इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढला; त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरण्यावर भर असून, सोयाबीननंतर दुसरे पीकदेखील घेता येते. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पर्याय घेतला.

- नितीन खंडागळे.

...

कृषी अधीक्षक म्हणतात

जिल्ह्यात कापूस सर्वाधिक क्षेत्रावर घेतला जात होता. मात्र, कापसाचे क्षेत्र या वर्षी घटले आहे. सरासरीच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा वाढला आहे. क्षेत्र वाढण्यामागे अनेक कारणे असून, कमी कालावधीत येणारे पीक हे एक कारण आहे.

- बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड.

...

गत पाच वर्षांत मिळालेले दर

वर्ष क्विंटलमध्ये दर

२०१७ ३२०० ते ४०००

२०१८ ३४०० ते ४५००

२०१९ ३८०० ते ५०००

२०२० ३००० ते ९०००

२०२१ १००० ते ११०० (अंदाजे).