शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

कोरोना काळात मानसिक आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ; भावनिक, आर्थिक आधार देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST

बीड : कोरोनाकाळात संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींना आपला व्यवसाय गमवावा लागला. अनेकांच्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती ...

बीड : कोरोनाकाळात संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींना आपला व्यवसाय गमवावा लागला. अनेकांच्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती कोरोनामुळे मृत झाला आहे. त्यामुळे हा परिवार नैराश्यात आहे. हा आघात अनेकांना सहन होणारा नाही. त्यामुळे अनेक कुटुंब कोरोना होऊन गेल्यानंतर किंवा काही अप्रिय घटना घडून गेल्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडे समोपदेशन उपचार घेत आहेत. पूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण ७ ते १० टक्क्यांनी वाढल्याचेदेखील चित्र आहे.

अनेक कुटुंबाला भविष्याची चिंता सतावत आहे, तर काही व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेले आहेत. या सर्व परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा आधार घेतला जात आहे. कुटुंबीयांकडून अशा व्यक्तींचे सांत्वन केले तरी कोरोनाच्या धक्क्यातून अनेकजण बाहेर काढण्यासाठी नातेवाईक मित्रांसोबत मानसोपचार तज्ज्ञांचादेखील आधार घेतला जात आहे. मात्र, अनेकजण अद्यापदेखील आपले दु:ख लपवून ठेवत आहेत. याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर तसेच शरीरावर होत आहे. जेवण न जाणे, कमी बोलणे, रात्री झोप न येणे अशी लक्षणे दिसून येत आहे. याचा परिणाम कामकाजावरदेखील होत आहे. यासाठी त्यांना मानसिक आधाराची गरज असल्याचे दिसून येत आहे.

....

चिंतेमुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या

मागील वर्षी पीक चांगले आले होते. मात्र, अनेक शेतकऱ्यांना कोरोनाचा फटका बसला होता. त्यामुळे आर्थिक परिस्थितीदेखील बिकट झाली आहे. खरीप हंगामातील पीक विमा भरूनदेखील त्याचा लाभ न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. या वर्षात कोरोना काळातदेखील आतापर्यंत तब्ब्ल ७४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे, ही चिंतेची बाब आहे. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. ठोस उपाययोजना करण्यात ते अपयशी झाले आहेत. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे त्याने चिंताग्रस्त होऊन आत्महत्येसारखा पर्याय अवलंबू नये. असे विचार येत असल्यास संपर्क करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले आहे.

...

हे दिवसही जातील

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकजण व्यवसायात बुडाले. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे.

लॉकडाऊन उघडताच पुन्हा आशेचा किरण दिसत आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा सामना हिंमतीने करण्याची गरज आहे.

कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. शिवाय हेही दिवस जातील, असा विश्वास बाळगणे आवश्यक आहे.

...

मानसोपचार तज्ज्ञ काय म्हणतात.....

पहिल्या लाटेत मानसिक तणावाखाली जगणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होती. दुसऱ्या लाटेत याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना रात्रीची झोप येत नाही. काहींना घाबरल्यासारखे होते. लैंगिक आजाराचे प्रमाणही वाढल्याच्या तक्रारी येत आहेत. यातून मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे.

-डॉ. सुदाम मोगले, मानसोपचार तज्ज्ञ.