शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

कोरोना काळात मानसिक आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ; भावनिक, आर्थिक आधार देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST

बीड : कोरोनाकाळात संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींना आपला व्यवसाय गमवावा लागला. अनेकांच्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती ...

बीड : कोरोनाकाळात संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींना आपला व्यवसाय गमवावा लागला. अनेकांच्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती कोरोनामुळे मृत झाला आहे. त्यामुळे हा परिवार नैराश्यात आहे. हा आघात अनेकांना सहन होणारा नाही. त्यामुळे अनेक कुटुंब कोरोना होऊन गेल्यानंतर किंवा काही अप्रिय घटना घडून गेल्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडे समोपदेशन उपचार घेत आहेत. पूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण ७ ते १० टक्क्यांनी वाढल्याचेदेखील चित्र आहे.

अनेक कुटुंबाला भविष्याची चिंता सतावत आहे, तर काही व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेले आहेत. या सर्व परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा आधार घेतला जात आहे. कुटुंबीयांकडून अशा व्यक्तींचे सांत्वन केले तरी कोरोनाच्या धक्क्यातून अनेकजण बाहेर काढण्यासाठी नातेवाईक मित्रांसोबत मानसोपचार तज्ज्ञांचादेखील आधार घेतला जात आहे. मात्र, अनेकजण अद्यापदेखील आपले दु:ख लपवून ठेवत आहेत. याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर तसेच शरीरावर होत आहे. जेवण न जाणे, कमी बोलणे, रात्री झोप न येणे अशी लक्षणे दिसून येत आहे. याचा परिणाम कामकाजावरदेखील होत आहे. यासाठी त्यांना मानसिक आधाराची गरज असल्याचे दिसून येत आहे.

....

चिंतेमुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या

मागील वर्षी पीक चांगले आले होते. मात्र, अनेक शेतकऱ्यांना कोरोनाचा फटका बसला होता. त्यामुळे आर्थिक परिस्थितीदेखील बिकट झाली आहे. खरीप हंगामातील पीक विमा भरूनदेखील त्याचा लाभ न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. या वर्षात कोरोना काळातदेखील आतापर्यंत तब्ब्ल ७४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे, ही चिंतेची बाब आहे. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. ठोस उपाययोजना करण्यात ते अपयशी झाले आहेत. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे त्याने चिंताग्रस्त होऊन आत्महत्येसारखा पर्याय अवलंबू नये. असे विचार येत असल्यास संपर्क करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले आहे.

...

हे दिवसही जातील

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकजण व्यवसायात बुडाले. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे.

लॉकडाऊन उघडताच पुन्हा आशेचा किरण दिसत आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा सामना हिंमतीने करण्याची गरज आहे.

कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. शिवाय हेही दिवस जातील, असा विश्वास बाळगणे आवश्यक आहे.

...

मानसोपचार तज्ज्ञ काय म्हणतात.....

पहिल्या लाटेत मानसिक तणावाखाली जगणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होती. दुसऱ्या लाटेत याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना रात्रीची झोप येत नाही. काहींना घाबरल्यासारखे होते. लैंगिक आजाराचे प्रमाणही वाढल्याच्या तक्रारी येत आहेत. यातून मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे.

-डॉ. सुदाम मोगले, मानसोपचार तज्ज्ञ.