शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी सुधरा; नियम पाळा, कोरोना उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:33 IST

नितीन कांबळे कडा : एप्रिलमध्ये जिल्ह्याच्या हद्दीवर कोरोनाने सुरूवात केली आणि दोन हजार पंचेचाळीस लोकांना आजवर लागण होऊन ...

नितीन कांबळे

कडा : एप्रिलमध्ये जिल्ह्याच्या हद्दीवर कोरोनाने सुरूवात केली आणि दोन हजार पंचेचाळीस लोकांना आजवर लागण होऊन बेचाळीस लोकांना जीव गमवावा लागला. एवढे होत असताना कोरोना गेला म्हणून बिनधास्त नियम तोडून फिरल्याने आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. नागरिकांनो, नियम पाळा प्रशासनाला सहकार्य करा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे आजवर रुग्ण सापडले असून मुत्यूचे प्रमाण देखील वाढले होते. नंतर कोरोना आटोक्यात आला म्हणत नियमावली शिथिल होताच नागरिक सुसाट झाले. मास्क नाही, सोशल डिस्टन्स नाही, सॅनिटायझर नाही की कसले गांभीर्य नसल्याने आता गेलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढत बाधितांचा आकडा रोजच्या रोज वाढत चालल्याने प्रशासन सक्रिय झाले असले तरी नागरिकांना कसलेच देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील जनतेला नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

काय म्हणतात अधिकारी...

चिंता वाढली असून कोरोना संसर्ग वाढतोय कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रशासन कोरोनाला थोपवण्याचा प्रयत्न करत असले तरी, म्हणावे तेवढे यश जनतेच्या निष्काळजीपणामुळे येत नाहीये. तालुका पातळीवर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून कोरोनाची धग गावकुसापर्यंत जाऊ शकते. यासाठी प्रशासनाच्या नियमाचे पालन करून सहकार्य करावे. लक्षणे दिसताच आरोग्य विभागाला कळवावे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी सांगितले.

तहसील कार्यालयात नुकतीच प्रशासनातील सर्व अधिकारी यांची बैठक घेतली असून भरारी पथके, स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांना दंड केला जाणार असून गर्दीच्या ठिकाणी वरवर लक्ष ठेवून नियम पाळण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना तालुकास्तरावरील प्रशासकीय अधिकारी यांना दिल्या असून जनजागृतीची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी लोकमतला सांगितले.

आष्टी,पाटोदा, शिरूर या तिनही तालुक्यात विनामास्क असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू असून जनजागृती सुरू आहे. जनतेने देखील नियमाचे पालन करावे असे आवाहन आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांनी लोकमतला सांगितले.