शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा तोंडावर असताना लिहिण्याची सवय मोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST

अंबाजोगाई : गेल्या वर्षभरापासून शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीनेच सुरू आहे. या ऑनलाईन पद्धतीमुळे हस्तलेखनाचा सराव मोठ्या ...

अंबाजोगाई : गेल्या वर्षभरापासून शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीनेच सुरू आहे. या ऑनलाईन पद्धतीमुळे हस्तलेखनाचा सराव मोठ्या प्रमाणात कमी झाला. आता महिनाभरातच दहावी व बारावीची परीक्षा सुरू होईल. अशावेळी लिखाणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव न राहिल्यास परीक्षा देतांना त्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागेल की काय? अशी चिंता पालकांना भेडसावू लागली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण ऑनलाईन सुरू झाले. गेल्या वर्षभरापासून सर्वच विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकविला जातो. बहुतांश विद्यार्थी कोरोनाच्या भीतीमुळे घरात बसूनच ऑनलाईन अभ्यास करू लागले होते. अजूनही विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईनच सुरू आहे. आता सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतील. इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा महिनाभरावर येऊन ठेपल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी सातत्याने मोबाईल, लॅपटॉप व संगणकाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यामुळे त्यांचा हस्तलेखनाचा सराव अचानक बंद झाला. सर्व काही ऑनलाईनच झाले. दैनंदिन जीवनात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात होणाऱ्या दैनंदिन तासिका. तासिका व्यतिरिक्त लावण्यात आलेल्या शिकवण्या यामध्येही पुन्हा तेच मिळणारे शिक्षण याचा सराव मोठ्या पद्धतीने लिखाणातूनच होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना हस्तलेखनाचा सराव दैनंदिन असतो. मात्र, आता या हस्तलेखनापासून विद्यार्थी दूर राहिले आहेत. आता परीक्षा जवळ आल्याने व लिखाणाचा सराव घटल्याने त्यांना लिखाणाचा मोठा सराव करावा लागणार आहे. अन्यथा लिहितांना वेळ अपुरा पडणे या गंभीर समस्येला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. याबाबतीत विद्यार्थ्यांनी वेळीच दक्षता बाळगून लिखानाचा सराव करावा म्हणजे त्यांना कोणतीही समस्या उद्भवणार नाही, असा सल्ला प्रा. चंद्रकांत मुळे यांनी दिला आहे. आपल्या पाल्याला लिखाणाबाबत अशा अडचणी निर्माम होतील की काय? अशी भीती पालकांना भेडसावू लागली आहे.