शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:27 IST

कडा : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्यास ऐन बहरात आलेली गहू,हरभरा, मका, कांदा ही पिके वाया ...

कडा : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्यास ऐन बहरात आलेली गहू,हरभरा, मका, कांदा ही पिके वाया जाण्याच्या शक्यतेमुळे शेतकरी चिंतेत आहेत.

यावर्षी पाऊस जोरदार पडल्याने तालुक्यात मोठ्या क्षेत्रावर रबीची पेरणी झाली. कमी पाण्यात लवकर येणाऱ्या गव्हाच्या जाती उपलब्घ असल्यानेही गव्हाचे क्षेत्र वाढलेले आहे. मात्र, रबी हंगामावर यावर्षी ढगाळ वातावरणाचे सावट आहे. रोगांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागली. त्यातच चार दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. शिवाय सकाळी दाट धुक्याची चादर पडत असल्याने रबी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. येथील कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांना विचारणा केली असता सध्या ढगाळ वातावरणामुळे अळी व किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो यापासून बचाव करण्यासाठी कृषी विभागाचा सल्ला घेऊन उपाययोजना कराव्यात असे त्यांनी सांगितले.

आभाळाचा कांद्यावर परिणाम

मागील काही महिन्यांपासून कांद्याचे दर गगनाला भिडल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. सहा हजार रुपये किलोप्रमाणे बियाणे खरेदी करून कांद्याची लागवड केलेली आहे. मात्र, आठ दिवसांपासून आष्टी तालुक्यात सूर्यदर्शनच झाले नाही. ढगाळ वातावरणाचा कांद्याच्या पिकावर मोठा परिणाम झालेला आहे. शेतातच कांद्याचे रोपे जागेवर जळण्याचे प्रमाण वाढले आहे.

हरभरा पडतोय पिवळा

हरभराही ढगाळ वातावरणाने पिवळा पडला आहे. या रोगापासून बचावासाठी शेतकऱ्यांना आता औषध फवारणी करणे गरजेचे झाले आहे. ज्वारी पिकावरही ढगाळ वातावरणाचा मोठा परिणाम झालेला पहावयास मिळत आहे. ज्वारीला सध्या दाणे भरत असून अनेक ठिकाणी चिकटा रोग पडल्याने ज्वारीचे पीकही धोक्यात आले आहे. तर ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने गव्हावर मावा आला आहे. काही भागांत गव्हावर अळीचाही प्रादुर्भाव झाला आहे.

उत्पन्न घटण्याची भीती

गेल्या आठवड्यात सतत ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एवढेच नव्हे, तर जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी थंडी अजूनही वाढलेली नाही. ढगाळ वातावरण आणि थंडीची उणीव असल्याने उत्पन्नात घट होण्याची धास्ती निर्माण झाली आहे.

- हरिभाऊ सांगळे ,शेतकरी.

पाणी आहे तर निसर्ग साथ देईना

मागील तीन वर्षे दुष्काळात गेल्याने नियोजित पिके घेता आली नाहीत. यावर्षी पाऊस झाल्याने पाणी उपलब्ध झाले आहे. परिणामी यावर्षी चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना आशा होती. परंतु, ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने यावर्षीच्या उत्पन्नावरदेखील पाणी फेरते की काय? या धास्तीने शेतकरीवर्ग सध्या चिंतेत आहे.

-अनंत कर्डीले , शेतकरी.