शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
3
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
4
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
5
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
6
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
7
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
8
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
10
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
11
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
12
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
13
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
14
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
15
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
16
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
17
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
18
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
19
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
20
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शेत, पाणंद रस्त्याची कामे होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:25 IST

अंबाजोगाई : शेत, शिव, पाणंद व गावरस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी गावपातळीवर गावरस्ता समिती गठित करण्याचा निर्णय ...

अंबाजोगाई : शेत, शिव, पाणंद व गावरस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी गावपातळीवर गावरस्ता समिती गठित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्यापही अंबाजोगाई तालुक्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसून गाव रस्ता समिती केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेता यावी. शेतमालाला बाजारात पोहोचविण्यासाठी आवश्यक रस्त्याची (पाणंद) कामे पूर्णत्वाला नेण्यासाठी गावपातळीवर गावसमित्या स्थापन करण्याचा निर्णय तत्कालीन राज्य शासनाने घेतला होता. तहसील कार्यालयामार्फत ग्रामपंचायतींना परिपत्रकाद्वारे अशा समित्या स्थापन करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. या समित्या स्थापन झाल्या असत्या तर गावातील शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिव रस्ते मोठ्या प्रमाणात मोकळे झाले असते. प्रत्येकाला शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध झाला असता. ही यंत्रणा गावपातळीवरच कार्यरत असल्याने परस्परांतील वाद, तंटे, गावातच मिटवून रस्ते निर्माण होणार होते.

या ग्रामसमित्यांमध्ये सरपंच, अध्यक्ष तर मंडळाधिकारी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, प्रगतशील शेतकरी, ग्रामपंचायतच्या महिला सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, पोलीस पाटील, तलाठी, कृषी साहाय्यक अधिकारी, बीट जमादार आदींचा समावेश असणार होता. या समित्या अस्तित्वात आल्या तर सर्वच विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांचा समन्वय सहज उपलब्ध झाल्याने अनेक अडचणी सोडविल्या गेल्या असत्या. परंतु अशा समित्या अद्यापही कागदावरच आहेत. त्यांची अंमलबजावणी झाली नाही. शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न हीच ग्रामीण भागातील मुख्य समस्या असते.

या माध्यमातून गावपातळीवरच रस्त्याची कामे झाली असती.

ग्रामीण भागातील अनेक शिव रस्ते व पाणंद रस्ते आजही अतिक्रमण अवस्थेत आहेत. याचा मोठा अडथळा सामान्य शेतकऱ्यांना होतो. हे रस्ते अतिक्रमणमुक्त होऊन या रस्त्याच्या कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देऊन ग्रामसमितीच्या माध्यमातून असे रस्ते तत्काळ पूर्ण करावेत. या वर्षी झालेल्या मोठ्या पावसामुळे सर्वच रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे.

गावोगावी या समित्यांच्या माध्यमातून रस्त्यांची पुनर्निमिती करण्यासाठी ही योजना दिशादर्शक ठरू शकते. यासाठी तहसील कार्यालयाने ग्रामसमित्या अस्तित्वात आणाव्यात, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे यांनी केली आहे.