शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर बनावट अकाऊंटमुळे वाढली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST

सायबर सेलकडे तक्रारी वाढल्या : फेक अकाऊंटवरून बदनामी करण्याचे प्रकार वाढले बीड : इंटरनेट स्वस्त झाल्यापासून सोशल मीडियाचा वापरदेखील ...

सायबर सेलकडे तक्रारी वाढल्या : फेक अकाऊंटवरून बदनामी करण्याचे प्रकार वाढले

बीड : इंटरनेट स्वस्त झाल्यापासून सोशल मीडियाचा वापरदेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात बनावट फेसबुक, इन्स्ट्राग्राम, किंवा इतर प्रोफाईल तयार करून पैशाची मागणी करणे, जातीय तेढ निर्माण होईल असा मजकूर लिहिणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील बनावट अकाऊंटमुळे डोकेदुखी वाढली आहे. असे बनावट अकाऊंट बंद करून कारवाई करण्यासाठी सायबर सेलकडील तक्रारी मागील काही वर्षात वाढल्या आहेत.

सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सर्वजण घरी बसून होते. त्यामुळे या काळात व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचेदेखील समोर आलेले आहे. दरम्यान, या सोशल मीडियामुळे जसे अनेक फायदे झाले आहेत. तसेच याचा गैरवापर करणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. लॉकडाऊन काळात अडचणीत असल्याचे सांगून अनेकांना पैशाची मागणी करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तर, संबंधित व्यक्तीला आपले बनावट खाते तायर केले आहे याची कल्पनादेखील नसते. त्यामुळे अशा ठगांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. याप्रकरणाच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत. त्याचसोबत जातीय तेढ निर्माण होईल असे संदेश पाठवणे किंवा पोस्ट करणे अशा अकाऊंटचालकांवर देखील कारवाई केली जाते. यासाठी सायबर सेल २४ तास कार्यरत असते.

सायबर सेलकडे आलेल्या तक्रारी

२०२१- ११०

२०२०- ८५

२०१९ -८०

कोरोना काळातमध्ये तक्रारी वाढल्या

कोरोनाच्या अगोदर सायबर सेलकडे फसवणुकीच्या तक्रारींचा ओघ कमी होता.

परंतु गेल्या दीड वर्षात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अनेकांच्या बँक खात्यातून पैसे गायब झाल्याच्या तक्रारीदेखील सायबरसेलकडे येत असून, त्याचा तपास केला जात आहे.

सात दिवसांत होते खाते बंद

सायबर सेलकडे सोशल मीडियावरील अकाऊंट हॅक झाले असेल तर, त्याची तक्रार सायबर सेलकडे केली जाते. दरम्यान, या फेसबुक अकाऊंटची लिंक संबंधित कंपनीकडे पाठवली जाते. त्यानंतर सर्व पडताळणी करून ते बनावट सोशल मीडिया खाते बंद केले जाते. त्यामुळे पुढील काळात होणारी फसवणूक टाळण्यास मोठी मदत होते.

पोलिसांसाठी वेगळे पोर्टल

सोशल मीडियावरील अकाउंट हॅक झाल्याची तक्रार सायबर सेलकडे प्राप्त झाल्यानंतर या विभागाच्या माध्यमातून ई-मेल आयडी व इतर माहिती घेऊन संबंधित व्यक्तीचा पासवर्ड परत मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यानंतर तो पासवर्ड फॉरमॅट करण्यात येतो

जेणेकरून वापरकर्त्याला वेगळा पासवर्ड देऊन ते खाते वापरता येते. फेसबुककडे तक्रार करण्याऐवजी नागरिकांनी सायबर सेलकडे तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीवर तात्काळ कार्यवाही केली जाते. यासाठी सायबर सेलकडे एक वेगळे पोर्टलदेखील असते. सायबर सेलमध्ये हॅकिंग व इतर किचकट प्रकरणांचा छडा लावण्यासाठी पोलीस प्रशासनातील तज्ज्ञ अधिकारी कर्मचारी यांची नियुक्त याठिकाणी करण्यात आलेली असते.

तुम्हाला बनावट अकाऊंट दिसले तर...

सोशल मीडियावर गेल्या काही वर्षात फेसबुक किंवा इतर बनावट खाते उघडून गैरवापर केल्याचे प्रकार वाढेल आहेत.

विशेष करून फेसबुक संदेशाद्वारे अडचणीत असल्याचे सांगून पैशाची मागणी केली जात आहे. किंवा धार्मिक भावना दुखवणारे सतत चितावणीखोर लिखाण या माध्यमांमधून केले जात असेल, त्यासाठी बनावट खात्याचा वापर केला जात असेल असे लक्षात आल्यास त्याची तक्रार संबंधित पोलीस ठाणे किंवा सायबर सेलकडे तक्रार करता येते.

बीड सायबर सेलकडून असे बनावट अनेक सोशल मीडिया खाते बंद करण्यात आले आहेत. तर, काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.