शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या पावसामुळे जिल्ह्याची वाटचाल टँकरमुक्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST

बीड : जिल्ह्यात कमी पावसामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात १ हजार टँकर पाणी ...

बीड : जिल्ह्यात कमी पावसामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात १ हजार टँकर पाणी पुरवठ्यासाठी यापूर्वी लागलेले आहेत. मात्र, मागील दोन वर्षांत झालेल्या चांगल्या पावसामुळे टँकरमुक्तीकडे बीड जिल्ह्याची वाटचाल सुरू झाल्याचे चित्र असून, यावर्षी देखील बोटावर मोजण्याइतके टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशासनाकडून टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये १८ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, ५२९ गावांध्ये बोअर व विहीर अधिग्रहण करण्यात येणार आहे, तर १९० गावांमध्ये तात्पुरती पूरक नळ योजना राबवण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील बोअर व विहिरींची दुरुस्ती करण्याची मागणी सरपंचांच्या वतीने करण्यात आलेली आहे. याकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. वेळोवेळी मागणी करून देखील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून हातपंप, विहीर व बोअरची दुरुस्ती होत नसल्यामुळे सरपंच संघटनेकडून संताप व्यक्त केला जात आहे, तर या आठवड्यात मागणीप्रमाणे दुरुस्ती झाली नाही तर, जिल्हाधिकारी तसेच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रमुखांची तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील एकूण ११५२ गावे, ६७४ वाड्या-वस्त्यांसाठी २०८४ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यासाठी २ कोटी ५६ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा एप्रिल महिन्यासाठी तयार करण्यात आला आहे. उपाययोजना म्हणून हा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. मात्र, टँकरची आवश्यकता भासण्याची शक्यता कमी असून, जरी गरज लागली तर शासकीय टँकरद्वरे पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पाऊस चांगला झाल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई भासणार नाही, असा अंदाज देखील तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे, तर टँकरमुक्तीकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू असल्याचे चित्र सद्य:स्थितीमध्ये दिसत आहे.

जिल्ह्यातील एकूण गावे - १३९३

विहिरींमधील गाळ काढला जाणार -३९

बोअरवेलची दुरुस्ती २८१

विहीर व बोअर अधिग्रहण सुरू

ज्या गावांमध्ये शासकीय हातपंप किंवा विहिरीचे पाणी कमी झाले आहे. त्या गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी खाजगी विहीर व बोअर अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून मागवण्यात आले आहेत. त्यानुसार पुन्हा एकादा स्थळ पाहणी करून प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार आहे.

सुरुवातीला शासकीय टँकरद्वारे होणार पाणीपुरवठा

पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची आवश्यता भासेल असे चित्र नाही. मात्र, जरी तशी परिस्थिती भासली तर, शासकीय टँकरद्वारे सुरुवातीला पाणीपुरवठा केला जाणार आहे, तर जास्त प्रमाणात टंचाई भासल्यास खाजगी टँकरची व्यवस्था करण्यात येईल. त्याठिकाणी देखील जीपीएसच्या माध्यमातून टँकरवर लक्ष ठेवले जाणार आहे.

जलयुक्त शिवार, पाणी फाऊंडेशनचा फायदा

दुष्काळाच्या काळात बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार व पाणी फाऊंडेशन तसेच इतर सेवाभावी संस्थांकडून मृदा व जलसंधारणाची कामे करण्यात आली होती. त्यानंतर सलग झालेल्या दोन वर्षांतील पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूजल पातळी वाढली असून, पाणीटंचाई कमी होणार आहे.

पाणीटंचाई समस्या भेडसावणारी गावे ११७

पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करणार २०८४