शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
5
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
7
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
8
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
9
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
10
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
11
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
12
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
13
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
14
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
15
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
16
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
17
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

दुष्काळातही उत्कृष्ट नियोजनाने माळरानावर फुलविली शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 12:04 IST

यशकथा : दुष्काळातही हिरवेगार रान पाहून इतर शेतकरी अचंबित होत आहेत.

- अनिल महाजन ( धारूर जि. बीड) 

बीड जिल्ह्यातील पांगरी, ता. धारूर येथील शेतकरी साहेबराव शहाजी थोरात यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करीत माळरानावर हिरवीगार शेती फुलविली. दुष्काळामुळे परिसरात सगळीकडे कोरडे रान दिसत असताना, साहेबराव यांचे हिरवेगार रान पाहून शेतकरी अचंबित होत आहेत. अर्थात यासाठी साहेबराव यांचे उत्कृष्ट नियोजन व काबाडकष्टाचे हे फळ आहे.

निसर्गाशी सामना करीत साहेबराव यांनी ही किमया साध्य केली आहे. ज्वारीसह विविध जोमदार असलेली पिके पाहण्यासाठी त्यांच्या शेतात शेतकरी भेट देत आहेत. पांगरी येथे  साहेबराव थोरात यांच्याकडे १६ एकर शेतीपैकी बहुतांश जमीन कोरडवाहू आहे. दुष्काळाची चाहूल लागल्यावर सजग होत सुरुवातीला कमी कालावधीतील पिके घेतली. उपलब्ध पाण्याचा विचार करून शेतीचे नियोजन केले. १६ एकरपैकी वहीतीस येईल तेवढीच जमीन कसली. 

२ एकरात ज्वारी, २५ आरमध्ये गहू, १५ आरमध्ये कांदा, २ आरमध्ये मिरची लावून दुष्काळी परीस्थितीत चांगली सांभाळली. दोन एकरात असलेल्या ज्वारीपासून त्यांना अंदाजे दीड लाख रुपयांपर्यंत तर कडब्यापासून किमान चाळीस हजार रुपयांपर्यंत कडबा (चारा) असे एकूण दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल, इतके दमदार ज्वारीचे पीक आले आहे. तर गव्हाच्या उत्पन्नातून अंदाजे  अंदाजे ३०  हजार रुपये उत्पन्न मिळेल, तसेच कांदा पीकही जोमात असून त्यापासूनही चांगली अर्थिक प्राप्ती होणार असल्याचे साहेबराव थोरात यांनी सांगितले. या पिकांची देखभाल व मशागत ते स्वत:च करतात. त्यामुळे निसर्गाची परिस्थिती विरोधात असतानाही साहेबरावांनी कष्टाच्या बळावर दुष्काळावर मात केली आहे. त्यांच्या या नियोजनबद्ध शेतीचे सर्वत्र कौतुक होत होते.

खरीप हंगामात याच जमिनीवर तीन बॅग सोयाबीनचा पेरा केला होता. अल्प पाऊस आणि त्यामुळे पडलेला दुष्काळ यात सोयाबीनचे पीक हातचे गेले होते. तीनबॅगसाठी नांगरणी, पेरणी, खुरपणी, फवारणी ते काढणीपर्यंत २८ ते ३० हजार रु पये खर्च केला होता. ३५ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न अपेक्षित असताना  अल्प उत्पन्न झाले. खरीप हंगाम वाया गेला. जनावरांना जगवण्यासाठी चारा प्रश्न गंभीर बनला. चाऱ्यासाठी ज्वारीची पेरणी करण्यासाठी जमिनीत ओल नव्हती. त्यामुळे त्यांनी उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करून जमीन भिजवून ज्वारी पेरली. शेतातील इंजिनच्या आधारे जमीन भिजवत या ठिकाणी ज्वारीची पेरणी केली. पाण्याचा अंदाज घेत गहू, कांदा आदी पिकेही कमी क्षेत्रावर घेत चांगली जोपासली. परिसरात हिरवे रान कमी असल्याने त्यांच्या शेतात रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे; मात्र साहेबराव हे रात्रंदिवस पिकाचे रक्षण करीत आहेत. 

पाण्याचे योग्य नियोजन करून उपलब्ध पाण्यावर दुष्काळातही हिरवीगार शेती फुलविता येते हे साहेबराव यांनी सिद्ध करून दाखविले आहे. घाबरून न जाता संकटांशी सामना केला, तर यश नक्कीच मिळते असा सल्ला साहेबराव थोरात देतात.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी