शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

Drought In Marathwada : लहरी निसर्गामुळे मांजराकाठची सुपीक शेती उद्ध्वस्त झाली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 14:39 IST

दुष्काळवाडा : पैसेवारी जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाटोद्यापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पारगाव घुमरा येथे प्रत्यक्ष पाहणी केली असता ही दाहकता समोर आली. 

- विलास भोसले, पारगाव घुमरा, ता. पाटोदा, जि. बीड. 

पेरले की पीक पदरात पडणारच असा इतिहास असलेली मांजरा नदीकाठची सुपीक काळ्या मातीची जमीन निसर्गाच्या अवकृपेमुळे उद्ध्वस्त होत आहे. दोन वर्षांपूर्वी सप्टेंबरमध्ये पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात आभाळ कोसळल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली. या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कापसावर २०१७ मध्ये बोंडअळीने हल्ला चढवला. पुढच्या हंगामात तरी कसर भरून निघेल या आशेवर असताना मेघराजाने डोळे वटारल्यामुळे हा बळीराजा पुरता होरपळून निघाला आहे. पैसेवारी जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाटोद्यापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पारगाव घुमरा येथे प्रत्यक्ष पाहणी केली असता ही दाहकता समोर आली. 

कायम दुष्काळी अशी  ओळख असलेले पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा हे गाव. मांजरा नदीकाठी असल्याने जमिनी सुपीक आहेत. एका पावसावर पेरणी केली तरी हमखास पिके पदरात पडणार असा या गावचा इतिहास. मात्र मांजरा नदीवर महासांगवी येथे सिंचन प्रकल्प झाला आणि नदीचे वाहणे बंद झाले. दोन वर्षांपूर्वीची अतिवृष्टी वगळता मागील अनेक वर्षांत नदी वाहिलीच नाही, असे या भागातील शेतकरी सांगतात.

गावातील शेतीउद्योग कोलमडून पडलाय. मात्र शेती कसल्याशिवाय पर्याय नसल्याने दिवस काढण्याचे काम सध्या शेतकरी करत आहेत. सोयाबीन आणि कापूस या नगदी पिकांकडे कल असून यंदा तर निसर्गाच्या लहरीपणाने चांगलेच फटकारले. खरिपाची ही अवस्था झाली असून पाऊस नसल्याने रबीचा हंगामही धोक्यात आला आहे. शेतीच पिकत नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापारीही अडचणीत आले आहेत. जनावरांचा चारा, पाण्यासह मजुरीचा प्रश्न गंभीर आहे. साखर कारखान्यावर जाण्याचा कल वाढला आहे. वर्ष कसे काढायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

पारगाव घुमराएकूण क्षेत्र -२३७६ हेक्टर बागायती क्षेत्र - ९० हेक्टरहंगामी बागायत -४७० हेक्टरजिरायती क्षेत्र - १८०० हेक्टर

खरीप २०१८ पीकपेरा कापूस - ७७५ हेक्टर    सोयाबीन - ८४० हेक्टरउडीद - २१० हेक्टर    मुग -१५० हेक्टरइतर - ६० हेक्टर    लोकसंख्या - ३५००

पावसाची सरासरी ६७८ मिमी - तालुक्यात सरासरी पाऊस पडतो ३८० मिमी - २०१५ १०२९ मिमी - २०१६ शेवटच्या टप्प्यात जोरदार पाऊस ९३५ मिमी - २०१७ ३१४ मिमी - २०१८ 

पाटोदा तालुक्यात सर्वच पिके वायापाटोदा तालुक्याचे खरीपाचे सरासरी क्षेत्र ४४ हजार २६९ हेक्टर एवढे आहे. यंदा सुरुवातीस पेरणीयोग्य पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पेरा झाला. विशेष म्हणजे पाच हजार हेक्टर जादा पेरा झाला. कपाशीवरील बोंडअळी हल्ल्यामुळे सोयाबीनचा पेरा वाढला. चार महिन्यांच्या काळात पावसाने मोठी हुलकावणी दिल्याने बहुतेक सर्वच पिके वाया गेली आहेत.

परिस्थिती कठीण  उडीद आणि मुगाचा उतारा १५ ते २५ टक्के आहे. सोयाबीन पिककापणी अहवाल तयार होत आहे. कापूस गेल्यात जमा आहे. ढोबळमानाने सरासरी उत्पन्न २५ टक्क्यांपर्यंत जाईल. परिस्थिती कठीण आहे.    - वसंत बिनवडे, तालुका कृषी अधिकारी, पाटोदा. 

बळीराजा काय म्हणतो?- मुबलक पाणी, वीज आणि स्वस्त खतं बियाणे मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज होणार नाही. लहरी निसर्गाचा फटका शेतकऱ्यांना  बसतोय. जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. - शहादेव माने  

- करपलेली पिकं बघून पिळवटून जातंय. ७२ च्या  दुष्काळात पाणी होतं, धान्य नव्हतं. आता अवघड गणित आहे. - लिंबराज किसन कोकाटे 

- तीन -चार वर्षांपासून कर्ज काढून पेरणी करतोय. दरवर्षी काहीतरी संकट येत आहे. आता धीर सुटायला लागलाय. शाळेत जाणारी पोरं, घर-प्रपंच चालवून कर्ज कसे फेडावे हाच पेच आहे. - सुरेश बाबूराव वारभुवन

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसBeedबीड