शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

धारूर घाटात धोकादायक वळणाच्या ठिकाणी मालवाहू ट्रकचा पुन्हा तिहेरी अपघात दोन तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 7:53 PM

या अपघातामुळे दोन तास वाहतूक ठप्प होती.

धारूर  (बीड ) : येथील घाटामध्ये अरूंद व धोकादायक वळणाच्या ठिकाणी मालवाहू ट्रकचा अपघात होण्याची मालिकाच सुरू आहे . बुधवारी साखरेच्या ट्रकचा अपघात झाल्यानंतर पुन्हा मालवाहू ट्रकचा तिहेरी अपघात झाल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातामुळे दोन तास वाहतूक ठप्प होती.

घाटात वळणाच्या ठिकाणी  ब्रेक फेल होणे व अरूंद ठिकाण असल्यामुळे मागील चार महिन्यापासून अपघातांची मालिका सुरू आहे. या अपघातामध्ये मालवाहू गाड्यांचे प्रमाण अधिक आहे. सोमवारी  रात्री येडेश्वरी कारखान्यावरून साखरे ने भरलेला ट्रक तेलगाव कडे जात असताना  धोकादायक वळणाच्या ठिकाणी ब्रेक फेल होऊन पलटी झाला होता पुन्हा बुधवारी दुपारी अरुंद व धोकादायक वळणामुळे धारूर येथील घाटात साखरेचाच ट्रक खडुयात जाऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ताजी असतांनाच गुरुवारी सकाळी म्हसोबा मंदीराजवळ वळणाच्या ठिकाणी गुरुवारी सकाळी तिन मालवाहू ट्रकच एकाच वेळी अपघात झाला.

यात कर्नाटकहून माजलगावकडे एक ट्रक बाजरी ( के.ए.२८, ए-६५०० ) जात होता. या वेळी तेल गावकडून तामीळनाडू कडे नॉयलॉन दोर घेवून जाणाऱ्या टी .एन.७४ , आर- ३७४६ ची समोरासमोर धडक झाली . या वेळी सांगलीहून परभणीकडे कुकूट खाद्य घेवून जाणाऱ्या एम .एच.२०, ए .टी -८८३२  ट्रकला बाजरी घेवून जाणाऱ्या ट्रकची बाजूने धडक झाली . यात दोन ट्रकचे समोरील भागाचे नुकसान झाले.या आपघाता मुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली होती.मोठी वाहणे हा रस्ता बंद झाल्याने जहागीरमोहा मार्गे न्यावी लागली.ग्रामीण भागातील जे विद्यिर्थी धारूर येथे शाळा महिविद्यालयास येतात त्याःना दोन ते तिन कि.मी.पायपीट करत यावे लागले .हा रस्ता अंरूद असल्याने अपघाताचा सापळाच हा रस्ता झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीडhighwayमहामार्ग