शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा तीर्थक्षेत्राला मोठा आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:31 IST

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : तीर्थक्षेत्र असलेल्या अंबाजोगाई शहराला कोरोनाचा मोठा आर्थिक फटका बसला. परिणामी वर्षभर बाजारपेठेत आर्थिक मंदी ...

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : तीर्थक्षेत्र असलेल्या अंबाजोगाई शहराला कोरोनाचा मोठा आर्थिक फटका बसला. परिणामी वर्षभर बाजारपेठेत आर्थिक मंदी राहिली. ज्यांचे उद्योग व्यवसाय मंदिर परिसरात आहेत. त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली. वर्षभराचा कालावधी उलटला तरीही अजून या मंदीतून अंबाजोगाईकर बाहेर निघाले नाहीत.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र व राज्याबाहेरून लाखो भाविक येत असतात. अंबाजोगाई हे तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्रात परिचित आहे. श्री योगेश्वरीचा महिमा तर आहेच. याशिवाय मराठीचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी, संतकवी दासोपंत व निसर्गरम्य ठिकाण म्हणून अंबाजोगाई पर्यटकांना आकर्षित करू लागले आहे. कोकणस्थांची कुलस्वामिनी योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, नागपूर व विविध ठिकाणांहून लोक दर्शनासाठी येतात. प्रामुख्याने दसरा नवरात्र महोत्सव. मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव, दिवाळीच्या सुट्या, उन्हाळ्याच्या सुट्या व प्रत्येक महिन्याची पौर्णिमा या कालावधीत भाविकांची मोठी गर्दी अंबाजोगाईत होते. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे अंबाजोगाईची बाजारपेठ फुलत चालली आहे. वाहनतळ, हातगाडे, पानफुलांचे दुकाने, प्रसादाची दुकाने, खेळण्याची दुकाने, साड्यांची दुकाने, हॉटेल्स, उपाहारगृह, पुरोहित यांची संपूर्ण मदार येणाऱ्या पर्यटकांवरच अवलंबून असते. मात्र, गेल्या मार्च महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद ठेवण्यात आली. तब्बल सात महिने मंदिरे उघडलीच नाहीत. परिणामी सर्व व्यवहार ठप्प राहिले. अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली. पुरोहितांना काम राहिले नाही. अशा स्थितीत अनेकांनी उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करणे सुरू केले. मंदिरे उघडल्यानंतर काही उलाढाल होईल, अशी अपेक्षा असताना भाविकांवर व व्यापाऱ्यांवर अनेक निर्बंध लादले गेले. यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यामुळे भाविकांनीही अंबाजोगाईकडे पाठ फिरविली. जे उत्सव झाले. ते भाविकांविना व इनडोअर झाल्याने बाजारपेठेला याचा कसलाच फायदा झाला नाही. गेल्या वर्षभरात आर्थिक मंदीचे सावट अद्यापही अंबाजोगाईकरांवर घोंगावतच आहे.