शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लग्न सोहळ्यासाठी ५० लोकांची कोरोना चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST

बीड : निर्बंध शिथिल होताच लग्न समारंभामध्ये कोरोनाचे नियम पायदळी तुडविले जात असल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर पावले ...

बीड : निर्बंध शिथिल होताच लग्न समारंभामध्ये कोरोनाचे नियम पायदळी तुडविले जात असल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार विवाह आयोजन करणाऱ्या वर आणि वधू पक्षाकडील मंडळींना अँटिजन आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे. नियमांचे पालन होते की नाही, याची नगर परिषद, नगर पंचायत व पोलीस विभागाने खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी तसेच ५० लोकांची उपस्थिती मर्यादा घालून देण्यात आली आहे. तरीदेखील जिल्ह्यात सर्वत्र लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होत असल्याने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी नियमावली लागू केली आहे.

सर्वप्रथम विवाह आयोजक वधूपक्ष किंवा वरपक्षाने संबंधित मंगल कार्यालय, मॅरेज हॉल हॉटेलमध्ये आवश्यक तारखेची पूर्वनोंदणी करावी. मंगल कार्यालय, मॅरेज हॉल, हॉटेल मालकांनी एका दिवशी केवळ एकाच विवाहाला परवानगी द्यावी. तारीख निश्चित झाल्यानंतर स्थानिक पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक करण्यात आले आहे.

स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी प्राप्त होताच उपस्थित राहणाऱ्यांची यादी, माहिती व पोलीस प्रशासनाच्या परवानगीचे पत्र संबंधित मंगल कार्यालय, मॅरेज हॉल, हॉटेल मालकाचे नाव ग्रामपंचायत, नगर परिषद, नगर पंचायतीकडे दाखल करावे लागणार आहे. ग्रामसेवक अथवा मुख्याधिकारी यांनी नियोजित तारखेच्या वेळेत संबंधित ठिकाणी भेट देऊन कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत. कोरोना नियमांचा भंग होत असल्यास संबंधित विवाह समारंभ आयोजकांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलीस करणार खात्री

स्थानिक पोलीस प्रशासनाने परवानगी देताना उपस्थित सर्व ५० लोकांची नावे, पत्ता, संपर्क क्रमांकाची यादी मंगल कार्यालय चालकांनी आयोजकांकडून घ्यावी. तसेच त्यांनी उपस्थित सर्वांचे अँटिजन आणि आटीपीसीआर तपासणी करून अहवाल निगेटिव्ह असल्याबाबत खात्री करावी.

भोजनावळीवर राहणार नजर

लग्न समारंभ आयोजकांनी उपस्थित लोकांना विवाहस्थळी पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे. मास्क वापरणे बंधनकारक करावे. लग्नस्थळी अनावश्यक गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. लग्नाकरिता बैठक तसेच भोजन व्यवस्थेमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल, याची दक्षता आयोजकांना घ्यावी लागणार आहे. घरी लग्नाचे आयोजन केले असेल तर सर्वप्रथम पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.