शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

बीडमध्ये बिंदूसरा नदीवर उंची न वाढवताच होणार पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:03 AM

बीड : शहरातील बिंदूसरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडून नवीन पुलाचे काम तातडीने सुरु होणार असून हा पूल पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. उंची न वाढवता हा पूल बनविण्याचा प्रयत्न असून, त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांच्या मालमत्तांना बाधा पोहोचणार नाही.

ठळक मुद्देविनायक मेटे, भारतभूषण क्षीरसागर यांची अधिका-यांशी चर्चा

सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील बिंदूसरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडून नवीन पुलाचे काम तातडीने सुरु होणार असून हा पूल पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. उंची न वाढवता हा पूल बनविण्याचा प्रयत्न असून, त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांच्या मालमत्तांना बाधा पोहोचणार नाही.

शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे क्षेत्रीय अधिकारी एम. चंद्रशेखर आणि प्रकल्प संचालक अजय गाडेकर, प्रबंधक महेश पाटील यांनी बायपासची पाहणी करून भूसंपादन आणि मावेजाच्या संदर्भातील तक्रारींचा आढावा घेतला. तसेच बायपासला शिदोड, पिंपळनेर रस्ता पॉर्इंटजवळ करावयाच्या स्लीपरोडची पाहणी या अधिकाºयांनी केली.

यावेळी आ. विनायक मेटे, बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पुलास भेट देऊन पुलाच्या बांधकामासंदर्भात संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी जलसंधारण खात्याचे कार्यकारी अभियंता वसंत गालफाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर आदी उपस्थित होते. गुरुवारी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी एस.चंद्रशेखर, आय.आर.बी.चे वरिष्ठ अधिकारी आणि इतर अधिका-यांची तातडीने नागपूर येथे बैठक घेतली होती. आय.आर.बी. करत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग २११ च्या कामांतर्गत स्कोप आॅफ चेंज वर्क या हेडखाली हे या पुलाचे काम होणार आहे.राष्ट्रीय महामार्ग : उद्घाटन आणि शुभारंभराज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या उद्घाटनांचा एक व्यापक कार्यक्रम जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. ज्या राष्टÑीय महामार्गाचे काम झाले असेल त्याचे उद्घाटन आणि नियोजित कामांचा शुभारंभ असा हा कार्यक्रम आहे.केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे आता जी पुलाची उंची आहे ती आणखी वाढवावी लागणार आहे. उंची वाढवल्यास अनेक मालमत्तांना बाधा पोहोचणार आहे. रस्त्यासाठी ह्या मालमत्ता संपादित कराव्या लागतील. यासाठी बराच अवधी लागेल. शिवाय मावेजा देण्यासाठी पैशाचाही प्रश्न निर्माण होईल. हे टाळण्यासाठी पुलाची उंची आहे तेवढीच ठेवावी लागेल.बिंदुसरा नदीला आतापर्यत किती वेळा पूर आले, पुराच्या पाण्याची पातळी किती वाढली होती, याचाही आढावा घेतला असता १९८९ साली झालेल्या अतिवृष्टीत पुराचे पाणी या पुलावरून वाहून गेले होते. त्यानंतर मात्र २८ वर्षात अशी परिस्थिती ओढवली नाही.

जलसंधारण विभागकडून घेणार मार्गदर्शनपूल आणि बंधारा असा दुहेरी उपयोगाचा पूल बनविण्याची मागणी होती. परंतु, आता पूल आणि बंधारा स्वतंत्र राहणार आहे. बंधारा पुलाजवळ कुठे घ्यायचा आणि त्याची उंची किती ठेवायची यासंदर्भात जलसंधारण विभागाकडून मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. या बंधाºयाची उंची दोन मीटरपर्यंत असेल, अशी माहिती आहे.