शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

बीडमध्ये पाणीटंचाईचा पहिला बळी; पाणी शेंदताना वृद्धा आडात पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:41 PM

रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

बीड : आडातून पाणी शेंदताना अचानक पाय घसरून पडल्याने विमलबाई कान्होबा शिंदे (८९) या वृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे सोमवारी सायंकाळी घडली. बीड जिल्ह्यात पाणी टंचाईचा हा पहिला बळी ठरला आहे.

विमलबाईंचा मुलगा पुण्यात राहत असल्याने त्या गावी एकट्याच राहायच्या. सध्या सर्वत्रच पिण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चकलांबा येथेही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. सोमवारी दुपारी विमलबाई या पाणी आणण्यासाठी गावातीलच आडावर गेल्या. पाणी शेंदताना त्यांचा पाय घसरून तोल गेल्याने त्या आडात पडल्या. परिसरातील नागरिकांनी हे पाहिल्यावर त्यांना तात्काळ बाहेर काढून जिल्हा रूग्णालयात आणण्यात आली. 

नाकातोंडात पाणी गेल्यामुळे प्रकृती चिंताजनक होती. सायंकाळच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी ही माहिती त्यांचा मुलगा बळीराम यांना दिली. त्यानंतर मंगळवारी जिल्हा रूग्णालय पोलीस चौकीत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेने बीड जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न समोर आला आहे. उन्हाळा अजून बराच दूर असताना फेब्रुवारीमध्येच जिल्ह्यात अनेक गावात टँकर सुरू झाले असून नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूwater shortageपाणीटंचाईMarathwadaमराठवाडा