शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

‘हक्क मागताना कर्तव्याची जाणीव महत्त्वाची’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST

अंबाजोगाई : भारतीय संविधानाने दिलेले हक्क मागताना कर्तव्याची जाणीव महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार शामसुंदर सोन्नर महाराज ...

अंबाजोगाई : भारतीय संविधानाने दिलेले हक्क मागताना कर्तव्याची जाणीव महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार शामसुंदर सोन्नर महाराज यांनी केले. येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्यावतीने आयोजित जागर लोकशाहीचा या कार्यक्रमांतर्गत शहरातील सफाई कामगारांच्या सत्काराचे, कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शामसुंदर सोन्नर यांनी भारतीय घटनेविषयी माहिती सांगितली.

भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान संधी, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिलेले आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून जनतेवर जबाबदारी दिली आहे. या देशाचे चांगले करण्याची जबाबदारी येथील जनतेची आहे, असे मत सोन्नर महाराज यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांनी केला. सफाई कामगार स्वच्छतेचे दूत, स्वच्छतेचे सैनिक आहेत. तरुणांमध्ये श्रमाचा संस्कार रुजला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रणव कोडीया यांनी मनोगत व्यक्त केले. या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

सफाई कामगारांच्या प्रतिनिधी म्हणून सुशीला सरवदे यांनी मनोगत व्यक्त केले. तर काही कामगार भगिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले. प्रास्ताविक महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या संचालिका डॉ. शैलजा बरूरे यांनी केले. सफाई कामगारांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सफाई कामगारांचे कार्य सीमेवरील सैनिकांइतके महत्त्वाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. धनाजी आर्य यांनी केले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी ऋचा कुलकर्णी हिने देशभक्तीपर गीत सादर केले. तर सानिका कोडीया हिच्या देशभक्तीपर गीत गायनाने व शांतीपाठ सादरीकरणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाला श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष कमलाकर चौसाळकर, कोषाध्यक्ष प्रा. माणिकराव लोमटे, सहसचिव एस. के. बेलुरगीकर, संचालिका अंजली गोस्वामी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. थारकर, योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. जोशी, प्राचार्य रमण देशपांडे, उपप्राचार्य डॉ प्रवीण भोसले, उपप्राचार्य डॉ आर. व्ही. कुलकर्णी, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.