शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

coronavirus: एकाच स्थळावर जास्तीत जास्त स्पर्धांचे आयोजन करा,  गोपीचंद यांची बीडब्ल्यूएफला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 4:23 AM

जगभरात आतापर्यंत ४१ लाखापेक्षा अधिक लोकांना लागण झालेला आणि तीन लाखापेक्षा अधिक व्यक्तींच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या कोरोना व्हायरसमुळे बीडब्ल्यूएफने आॅलिम्पिक क्वालिफायर्ससह आपल्या सर्व स्पर्धा जुलैपर्यंत स्थगित केलेल्या आहेत.

नवी दिल्ली : कोविड-१९ नंतर विश्व बॅडमिंटन महासंघाने जगात या खेळाचे योग्य प्रकारे संचालन करण्यासाठी काही नव्या पद्धतींचा अवलंब करायला पाहिजे आणि एकाच स्थळावर जास्तीत जास्त स्पर्धांचे आयोजन करायला हवे, अशी सूचना भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी विश्व महासंघाला केली आहे.जगभरात आतापर्यंत ४१ लाखापेक्षा अधिक लोकांना लागण झालेला आणि तीन लाखापेक्षा अधिक व्यक्तींच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या कोरोना व्हायरसमुळे बीडब्ल्यूएफने आॅलिम्पिक क्वालिफायर्ससह आपल्या सर्व स्पर्धा जुलैपर्यंत स्थगित केलेल्या आहेत.गोपीचंद म्हणाले, ‘बीडब्ल्यूएफने स्वास्थ्य कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करायला हवी. स्वरूप बदलायला हवे. स्पर्धेचे फॉर्मेट बदलायला हवे. आवश्यक असलेले सर्व बदल करायला हवे. माझ्या मते जर काही नवे करण्याची गरज असेल तर तसे करा आणि खेळाची आगेकूच कायम राखा.’आंतरराष्ट्रीय सर्किटचा बचाव करण्यासाठी बीडब्ल्यूएफने थॉमस व उबेर कप यासारख्या महत्त्वाच्या स्पर्धा आॅक्टोबरपर्यंत स्थगित केल्या आहेत आणि भारतासह सर्व संबंधित देशांना स्थगित करण्यात आलेल्या आॅलिम्पिक क्वालिफायर्सच्या नव्या तारखा निश्चित करण्यास सांगितले आहे.गोपीचंद म्हणाले, ‘माझी चिंता ही आहे की, तुम्ही तारखा बदलण्याचा प्रयत्न करीत आहात, पण माझ्या मते कदाचित विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. जर असेच होत राहिले तर पूर्ण पथकाला पुन्हा विविध देशांचा प्रवास करावा लागला तर हे खेळाडूंना जोखमीमध्ये टाकण्यासारखे असेल.’बॅडमिंटन खेळाडूंना जवळजवळ प्रत्येक आठवड्यात नव्या स्पर्धेसाठी प्रवास करावा लागतो. गोपीचंद म्हणाले, यात बदल व्हायला हवा. माझ्या मते खेळाडूंना एकाच स्थळावर जास्तीत जास्त स्पर्धा खेळण्याची संधी मिळायला हवी. भविष्यात हे करणे शक्य आहे.’जागतिक स्वास्थ्य संकट बघता खेळ सुरू करण्यासाठी प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये लढतींचे आयोजन करण्यात येईल. गोपीचंद म्हणाले, ‘प्रेक्षक नसतील तर खेळ टीव्ही व इंटरनेटपर्यंत मर्यादित राहील तर स्पर्धेचे आयोजन तीन वेगवेगळ्या स्थळांवर करण्याला अर्थ उरत नाही. खेळाडूंनाही तीन आठवडे एकाच स्थानावर ठेवता येईल.’ते पुढे म्हणाले, ‘उदाहरण द्यायचे झाल्यास स्पर्धा इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये आयोजित करण्याऐवजी या स्पर्धा कुठेही एकाच स्थळावर व्हायला हव्यात. ’ इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरला तीन महत्त्वाच्या आॅलिम्पिक क्वालिफायर्सचे यजमानपद भूषवायचे आहे. या व्यतिरिक्त भारतालाही एका स्पर्धेच्या यजमानपदाची संधी आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadmintoncorona virusकोरोना वायरस बातम्या