शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

तुमच्या स्कूटर व मोटारसायकलचे आरसे व्यवस्थित हवेतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:13 IST

दुचाकी वाहनांवरील आरसे हे अनेकांचे मोडलेले, खराब स्थिती असतात. त्याकडे अनेक चालकांना लक्षही द्यावेसे वाटत नाही. मात्र ही बाब कधी गंभीर अपघातालाही कारणीभूत ठरू शकते.

ठळक मुद्देदुचाकीला आरसा हा किती महत्त्वाचा आहे, ते लक्षात घ्यायला हवेआरशात मध्ये मध्ये बघून वाहन चालन करण्याची सवय ठेवावी लागतेतुमच्या ड्रायव्हींग कौशल्याचे प्रतिबिंब तुमच्या दुचाकीच्या आरशाद्वारेच पडत असते, हे लक्षात ठेवा

पुणे असो वा मुंबई सध्या दुचाकीस्वारांचे अपघात पाहिले व ऐकले, त्यांच्या अपघाताची छायाचित्रे पाहिली की बऱ्याच बाबी जाणवतात. त्यात एक म्हणजे अनेक दुचाकीस्वारांना जणांना मागून येणाऱ्या वाहनापासून धक्का लागलेला आहे. अपगातामध्ये जसे बेदरकार वेग कारणीभूत असतो, तसाच रस्त्यावर आपल्या मागे वा बाजूने कोण जात आहे, याची जाणीव नसल्याने अपघातांला अनेक जण निमंत्रण देत असतात. अनेक स्कूटर्स वा मोटारसायकल्सचे शहरातील अस्तित्त्व पाहिले म्हणजे केवळ सायकलऐवजी पेट्रोलवर चालणारी दुचाकी चालवीत आहोत, अशा प्रकारे दुचाकीस्वारांचे मत असावे.

आरटीओच्या नियमाप्रमाणे दुचाकीला आरसा हा सक्तीचा आहे, पण अनेकजण आरशाचे अस्तित्त्व केवळ पोलिसांना दाखवण्यापुरते ठेवत असावेत, अशी स्थिती दिसून येते. आरशामध्ये मागून कोणी वाहन ओव्हरटेक करीत आहे का, डाव्या बाजूने वा उजव्या बाजूने आपल्या अगदी जवळून कोणी जात आहे का, याची काळजी घेणे अगदी गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या दुचाकीच्या आरशांची स्थिती योग्य हवी, त्या आरशांची अवस्था चांगली हवी. पण अनेक दुचाकीच्या आरशांची दूरवस्था झालेली असते.

अनेक स्कूटर्सच्या आरशांनी मान टाकलेली असते तर मोटारसायकलींचे आरसे काहींनी काढूनच टाकलेले असतात, किंवा ते काढले गेल्यानंतर पुन्हा नव्याने लावले जात नाहीत. यामुळे रस्त्यांवर ठिकाणी अंदाज न आल्याने दुसऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो, कारण ओव्हरटेक करीत असताना हॉर्न देऊनही आरसा नसलेल्या मोटारसायकलस्वारांनी बाजूला होण्याचे वा काहीशी जागा मागील वाहनाला देण्याचे उदारपण दाखवले नाही, तर वादावादीचे प्रसंगही दिसून येतात. एकंदर आरसा नसला तर काय होते याची जाणीव त्यांना नसते. काहीवेळा आरसे मान टाकलेल्या स्थितीत असतात, त्यामुळे आरशामध्ये मागून काही वाहन येत आहे की नाही याची जाणीव तरी त्यांना कशी होणार?

दुचाकीला आरसा हा किती महत्त्वाचा आहे, ते लक्षात घ्यायला हवे. मागून येणारे चारचाकी वा दुचाकी वाहन, ओव्हरटेक करणारे वाहन, बाजूने जाणाऱ्या अन्य दुचाकी, त्या बाजूने जाणाऱ्या अन्य दुचाकींची स्थिती, नेंमक्या किती जवळ आहेत की योग्य अंतरावर आहेत त्याचा अंदाज येणे. शहरी रस्त्यांवर रांगेचे भान अधिक पाळावे लागते, त्यामुळे तुम्ही रांगेत असणे व त्याचबरोबर मागील वाहन रांगेत आहे की नाही, ते लक्षात घेणे हे देखील आरशामुळे समजू शकते. ओव्हरटेक करणारे वाहन अनेकदा हॉर्न देत नाही, ते त्याच्या रांगेतून सरळ पुढे जात असते, मात्र आपण रांगेत नीट नसलो किंवा त्या वाहनाला लागणारी पुरेशी जागा आपण सोडलेली नसली तर त्यावेळी तुम्हाला आरशाची गरज लागते. मागून येणारे वाहन व तुमचे वाहन तुमच्या रांगेत किती नीट आहे, ते लक्षात येते. आरशात मध्ये मध्ये बघून वाहन चालन करण्याची सवय ठेवावी लागते, मात्र आरसे नसणे किंवा ते मोडके वा मान टाकलेल्या स्थितीत असणे यामुळे आरशात बघून मागील वाहनांचा अंदाज घेण्याची मानसिकता संपते,सवय मोडते आणि त्याचे फटके मात्र मोठे बसू शकतात.

यासाठीच दुचाकीवरील आरशाची स्थिती चांगली असणे गरजेचे आहे. पार्किंग केलेले असताना आरशामध्ये आपला चेहरा न्याहाळत बसणारे व त्यासाठी दुचारी वा एकंदर वाहनांच्या आरशांना फिरवणारे महाभागही कमी नसतात. पण त्यामुळे आरशांचे अनेकदा नुकसान होत असते. आरसे तुटत असतात,खराब होत असतात, अशावेळी काही झाले तरी आरसा बदलणे, नीट करणे गरजेचे असते.आरशाला अन्य लोक हात लावताना दिसले तर त्याला प्रत्येक नागरिकानेही विरोध करून त्या व्यक्तीला समजावले पाहिजे. दुचाकी सुरू करण्यापूर्वी आरसे आपल्याला योग्य पद्धतीने जुळवून घेतले पाहिजेत, त्यामुळे आरशाचा वापर योग्य रितीने होऊ शकेल. तुमच्या ड्रायव्हींग कौशल्याचे प्रतिबिंब तुमच्या दुचाकीच्या आरशाद्वारेच पडत असते, हे लक्षात ठेवा.

टॅग्स :Automobileवाहन