शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

...तर गाडीही तुमची काळजी घेईल!

By हेमंत बावकर | Updated: September 24, 2018 14:20 IST

आपल्याकडील रस्ते किंवा बेदरकारपणे चालणारे वाहनचालक यांच्यामुळे जरी अपघातांचे प्रमाण वाढते असले तरीही आपणही तेवढेच कारणीभूत असतो. कारण गाडीची वेळच्यावेळी देखभाल केलेली नसल्याने रस्त्यातच गाडी बंद पडणे, टायर फुटणे किंवा अन्य कारणे या मागे असतात.

आपल्याकडील रस्ते किंवा बेदरकारपणे चालणारे वाहनचालक यांच्यामुळे जरी अपघातांचे प्रमाण वाढते असले तरीही आपणही तेवढेच कारणीभूत असतो. कारण गाडीची वेळच्यावेळी देखभाल केलेली नसल्याने रस्त्यातच गाडी बंद पडणे, टायर फुटणे किंवा अन्य कारणे या मागे असतात. यामुळे गाडीच्या देखभालीकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते. बऱ्याचदा गाडीही आपल्याला संकेत देत असते. मात्र आपण त्याकडे जाणते-अजाणतेपणी दुर्लक्ष करतो. पहा काय घ्यायची काळजी.

इंजिन ऑईलवाहनाचे हृदय म्हणजे त्याचे इंजिन. त्याच्या आतील पिस्टनना कार्य करण्यासाठी वंगन म्हणून इंजिन ऑईल असते. प्रत्येक कंपनीचा त्या इंजिन ऑइलच्या ग्रेडनुसार बदलण्याचा कालावधी असतो. कंपनीने दिलेले किलोमिटर जरी पार झाले नसले आणि वर्षाचा कालावधी संपला तर ऑईल बदलावेच. कारण ते ऑइल ठराविक कालावधीनंतर ‘डिसग्रेड’ म्हणजेच खराब व्हायला सुरुवात होते. यामुळे प्रवासावेळी ऐन वेगात असताना इंजिन गरम होऊन रस्त्यातच वाहन बंद पडण्याचे प्रकार होतात. याचा कुलंटवरही परिणाम होतो आणि वाहन रस्त्यातच थांबल्यास अपघातही होण्याची शक्यता असते. उष्णतेवरही कुलंटचे आयुष्य असते. जास्त उष्णतेच्या ठिकाणी कुलंट लवकर खराब होते. 

व्हील अलाइनमेंटवाहनाचा मोठा खर्च असतो तो म्हणजे टायरचा. ३० हजार किमी टायर चालतो. मात्र, या टायरची नीट काळजी न घेतल्यास प्रवासावेळी टायर फुटणे, पंक्चर होणे, अवेळी झीज झाल्याने ब्रेक न लागणे अशा घटना घडतात. यासाठी वेळोवेळी टायर अदलाबदली, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग करणे गरजेचे असते. तसेच टायरची हवा वेळोवेळी तपासणे आवश्यक असते. उपलब्ध असल्यास नायट्रोजन गॅस भरावा.

वाहन नेहमी  चालत नसल्यासबऱ्याचदा वाहने सावलीखाली किंवा उन्हात आठवडा आठवडा धूळ खात उभी केलेली असतात. वाहनाचे वजन टायरच्या एकाच भागावर पडल्याने हवा कमी होत राहते. त्यामुळे टायरला गोल कातरे(भेग) पडतात. हवेचा दाब नीट ठेवावा लागतो. वायपर काचेवरच न ठेवता ते उभे करून ठेवावे. वातावरणातील बदलांमुळे वायपरचे रबर टणक होऊ लागतात. यामुळे काचेवरील धूळ काढण्याऐवजी ते काचेवर ओरखडे काढतात.

ब्रेक ऑईलवाहन थांबण्यासाठी ब्रेक प्रणाली चांगली असावी. त्यामुळे ब्रेक पॅड वेळच्यावेळी बदलण्याबरोबरच ब्रेक फ्लुएड किंवा ऑईलही बदलणे गरजेचे असते. वाहन सारखेच वाहतूक कोंडी किंवा ब्रेक लावावे लागणाऱ्या भागात फिरत असल्यास वेळचेवेळी लक्ष द्यावे.

इंडीकेटरवाहनाचे इंडिकेटर दिवसा व रात्रीही गरजेचे असतात. लाईट, डावा-उजवा इंडिकेटर सुरु आहे का, याची तपासणी वेळोवेळी करावी. तसेच ब्रेकलाईट लागते का याचीही तपासणी करावी.

टॅग्स :carकारAutomobileवाहनroad safetyरस्ते सुरक्षाhighwayमहामार्ग