शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

...तर गाडीही तुमची काळजी घेईल!

By हेमंत बावकर | Updated: September 24, 2018 14:20 IST

आपल्याकडील रस्ते किंवा बेदरकारपणे चालणारे वाहनचालक यांच्यामुळे जरी अपघातांचे प्रमाण वाढते असले तरीही आपणही तेवढेच कारणीभूत असतो. कारण गाडीची वेळच्यावेळी देखभाल केलेली नसल्याने रस्त्यातच गाडी बंद पडणे, टायर फुटणे किंवा अन्य कारणे या मागे असतात.

आपल्याकडील रस्ते किंवा बेदरकारपणे चालणारे वाहनचालक यांच्यामुळे जरी अपघातांचे प्रमाण वाढते असले तरीही आपणही तेवढेच कारणीभूत असतो. कारण गाडीची वेळच्यावेळी देखभाल केलेली नसल्याने रस्त्यातच गाडी बंद पडणे, टायर फुटणे किंवा अन्य कारणे या मागे असतात. यामुळे गाडीच्या देखभालीकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते. बऱ्याचदा गाडीही आपल्याला संकेत देत असते. मात्र आपण त्याकडे जाणते-अजाणतेपणी दुर्लक्ष करतो. पहा काय घ्यायची काळजी.

इंजिन ऑईलवाहनाचे हृदय म्हणजे त्याचे इंजिन. त्याच्या आतील पिस्टनना कार्य करण्यासाठी वंगन म्हणून इंजिन ऑईल असते. प्रत्येक कंपनीचा त्या इंजिन ऑइलच्या ग्रेडनुसार बदलण्याचा कालावधी असतो. कंपनीने दिलेले किलोमिटर जरी पार झाले नसले आणि वर्षाचा कालावधी संपला तर ऑईल बदलावेच. कारण ते ऑइल ठराविक कालावधीनंतर ‘डिसग्रेड’ म्हणजेच खराब व्हायला सुरुवात होते. यामुळे प्रवासावेळी ऐन वेगात असताना इंजिन गरम होऊन रस्त्यातच वाहन बंद पडण्याचे प्रकार होतात. याचा कुलंटवरही परिणाम होतो आणि वाहन रस्त्यातच थांबल्यास अपघातही होण्याची शक्यता असते. उष्णतेवरही कुलंटचे आयुष्य असते. जास्त उष्णतेच्या ठिकाणी कुलंट लवकर खराब होते. 

व्हील अलाइनमेंटवाहनाचा मोठा खर्च असतो तो म्हणजे टायरचा. ३० हजार किमी टायर चालतो. मात्र, या टायरची नीट काळजी न घेतल्यास प्रवासावेळी टायर फुटणे, पंक्चर होणे, अवेळी झीज झाल्याने ब्रेक न लागणे अशा घटना घडतात. यासाठी वेळोवेळी टायर अदलाबदली, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग करणे गरजेचे असते. तसेच टायरची हवा वेळोवेळी तपासणे आवश्यक असते. उपलब्ध असल्यास नायट्रोजन गॅस भरावा.

वाहन नेहमी  चालत नसल्यासबऱ्याचदा वाहने सावलीखाली किंवा उन्हात आठवडा आठवडा धूळ खात उभी केलेली असतात. वाहनाचे वजन टायरच्या एकाच भागावर पडल्याने हवा कमी होत राहते. त्यामुळे टायरला गोल कातरे(भेग) पडतात. हवेचा दाब नीट ठेवावा लागतो. वायपर काचेवरच न ठेवता ते उभे करून ठेवावे. वातावरणातील बदलांमुळे वायपरचे रबर टणक होऊ लागतात. यामुळे काचेवरील धूळ काढण्याऐवजी ते काचेवर ओरखडे काढतात.

ब्रेक ऑईलवाहन थांबण्यासाठी ब्रेक प्रणाली चांगली असावी. त्यामुळे ब्रेक पॅड वेळच्यावेळी बदलण्याबरोबरच ब्रेक फ्लुएड किंवा ऑईलही बदलणे गरजेचे असते. वाहन सारखेच वाहतूक कोंडी किंवा ब्रेक लावावे लागणाऱ्या भागात फिरत असल्यास वेळचेवेळी लक्ष द्यावे.

इंडीकेटरवाहनाचे इंडिकेटर दिवसा व रात्रीही गरजेचे असतात. लाईट, डावा-उजवा इंडिकेटर सुरु आहे का, याची तपासणी वेळोवेळी करावी. तसेच ब्रेकलाईट लागते का याचीही तपासणी करावी.

टॅग्स :carकारAutomobileवाहनroad safetyरस्ते सुरक्षाhighwayमहामार्ग