शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

यंदा सोयाबीनची सर्वाधिक पेरणी

By admin | Updated: July 12, 2015 00:22 IST

यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ७ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे.

कपाशीला पर्याय : मूग, उडदाचेही क्षेत्र होणार रुपांतरित
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ७ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यापैकी ५ लाख ४६ हजार ४४७ हेक्टर क्षेत्रात ९ जुलै अखेर पेरणी झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक २ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे आहे. हे क्षेत्र कपाशी पेक्षा १ लाख २ हजार ६०१ हेक्टरने जास्त आहे. पावसाच्याव प्रदीर्घ खंडामुळे मूग, उडीदाचेही क्षेत्र सोयाबीनमध्ये रुपांतरित होत असल्याने सोयाबीनचे क्षेत्र सरासरीपेक्षा अधिक वाढणार आहे.
जिल्ह्यात सोयाबीनचे २ लाख ९३ हजार ३०० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ८९ टक्के क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झालेली आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ८ हजार ७५० हेक्टर, चिखलदरा ११ हजार ८१० हेक्टर, अमरावती ३१ हजार २१० हेक्टर, भातकुली २९ हजार ७०८ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ३८ हजार ३३० हेक्टर, चांदूररेल्वे १९ हजार हेक्टर, तिवसा २२ हजार ८८६ हेक्टर, मोर्शी १९ हजार २१२ हेक्टर, वरुड ८५० हेक्टर, दर्यापूर १४ हजार ७७२ हेक्टर, अंजनगाव सूर्जी १३ हजार ४२४ हेक्टर, अचलपूर १० हजार ४०९ हेक्टर, चांदूरबाजार १७ हजार ३२३ हेक्टर, धामणगाव रेल्वे २२ हजार ७१७ हेक्टर अशा एकूण २ लाख ६० हजार ४०१ हेक्टरवर पेरणी झाली.
खरीप हंगामात पेरणीच्या पहिल्या टप्प्यात सोयाबीनपेक्षा कपाशी वाणाची अधिक पेरणी झाली होती. मात्र नंतर सोयाबीन पेरणीचा वेग वाढला. सद्यस्थितीत कपाशीपेक्षा सोयाबीन १ लाख हेक्टरने अधिक क्षेत्र आहे. जिल्ह्यात कपाशीचे १ लाख ५७ हजार ७० हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ६ हजार २१०, चिखलदरा ५४४ हेक्टर, अमरावती ७ हजार ५४२ हेक्टर, भातकुली ५ हजार १७८ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ४ हजार ११७ हेक्टर, चांदूररेल्वे ४ हजार ६३३ हेक्टर, वरुड २६ हजार हेक्टर, दर्यापूर १८ हजार ५८९ हेक्टर, अंजनगाव १० हजार ६१ हेक्टर, अचलपूर १३ हजार ५२० हेक्टर, चांदूरबाजार १४ हजार ९२७ हेक्टर व धामणगाव रेल्वे तालुक्यात १८ हजार ७५६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. (प्रतिनिधी)

सोयाबीनच्या क्षेत्रात होणार वाढ
यावर्षीच्या हंगामात पावसात प्रदीर्घ खंड आहे. १७ दिवसांपासून पाऊ स बेपत्ता आहे. आणखी ५ ते ७ दिवस दमदार पावसाची शक्यता नाही. त्यामुळे ६० दिवस अल्पकालावधीचे मूग व उडीद पिके बाद होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र कपाशीमध्ये रुपांतरित होत असल्याने सोयाबीनची पेरणी सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात होणार असल्याची माहिती आहे.

वरुड तालुक्यात सर्वात कमी सोयाबीन पीक
सद्यस्थितीत वरुड तालुक्यात फक्त ८५० हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र जिल्ह्यात सर्वाधिक कपाशीची पेरणी वरुड तालुक्यात २६ हजार हेक्टरमध्ये झाली आहे. तर सोयाबीनची सर्वाधिक पेरणी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३८ हजार ३३० हेक्टरमध्ये झाली आहे.