शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

कुठे मुरते १० लाख लिटर पाणी?

By admin | Updated: January 4, 2017 00:25 IST

ज्या नांदगाव शहरवासीयांनी पाण्यासाठी प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसल्या वेळप्रसंगी पाण्यासाठी गोळीबारही झाला,

नांदगावला ६ लाख लिटरची गरज : वितरण मात्र १६ लाख लिटर मनोज मानतकर नांदगाव खंडेश्वर ज्या नांदगाव शहरवासीयांनी पाण्यासाठी प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसल्या वेळप्रसंगी पाण्यासाठी गोळीबारही झाला, त्या शहरात सद्यस्थितीत मात्र पाण्याचा शहरातील काही भागात प्रचंड अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे. नांदगाव शहराला दैनंदिन ६ लाख लीटर पाण्याची गरज असताना वितरण मात्र १६ लाख लीटर पाण्याचे होत आहे. नेमके १० लाख लीटर पाणी कुठे मुरतेय, हा या नगरपंचायतीसाठी संशोधनाचा विषय बनला आहे. नगरपंचायतीने अधिक वेळ न घालविता पाण्याच्या अपव्ययाला आळा घालणे गरजेचे आहे. नांदगाव शहराची लोकसंख्या १५ हजार असून प्रतिव्यक्ती ४० लीटर पाणी याप्रमाणे शहराकरिता ६ लाख लीटर पाण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत शहराकरिता चांदी धरण हा पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. त्याचप्रमाणे मोखड विहीर, इखार विहीर, इंदिरा आवास बोअर, खासदार बोअर असे पाण्याचे स्त्रोत आहेत. वर्षानुवर्षांपासून शहराला उन्हाळ्याच्या दिवसांत दुष्काळाच्या प्रत्येक झळा सोसाव्या लागतात. परंतु चांदी धरणावरून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर नागरिकांना भरपूर पाणी मिळेल व दुष्काळजन्य स्थितीतून कायमची सुटका होईल, असे चित्र निर्माण झाले होते. परंतु पाण्याच्या नियोजनचा अभाव व प्रचंड प्रमाणात असलेले अवैध कनेक्शन पाणी पुरवठ्याची खरी डोकेदुखी ठरली आहे. सद्यस्थितीत शहरात २ हजार वैध कनेक्शन असल्याची माहिती आहे, तर हजारांच्यावर अवैध कनेक्शन असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच अनेक ठिकाणी २ ते ३ कनेक्शन आहेत. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात पाणी प्रचंड प्रमाणात वाया जाते. काही भागात मात्र अद्यापही तीन दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे जर १६ लाख लीटर पाणी दैनंदिन वितरित होते, तर मग पाणी मुरतेय कुठे, याकडे नगरपंचायतीने जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. शहरामध्ये एकूण १७ वॉर्ड आहेत. त्या प्रत्येक वॉर्डात किती कनेक्शन दिल्या गेले याची सविस्तर शहानिशा नगरपंचायतीने केल्यास त्यातून एक हजारांच्यावर अवैध कनेक्शनचा आकडा बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच प्रत्येक वॉर्डात पाण्याचे नियोजन करताना प्रत्येकाला पाणी मिळते की नाही याची शहानिशा करावी व सार्वजनिक स्टँडपोजवर तोट्या बसविणे गरजेचे कारण त्याद्वारे प्रचंड प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायत वेळीच लक्ष देऊन जर पाण्याच्या अपव्ययाला आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत, तर शहरातील काही भागात कायमचा दुष्काळ राहील व उन्हाळ्यात पाणी असूनही नागरिकांना पाण्यासाठी मरणयातना सोसाव्या लागेल, एवढे मात्र निश्चित. अतिरिक्त पाण्याचा शोध घेऊ पाण्याचा अपव्यय कशाप्रकारे होत आहे, याची कारणमीमांसा शोधून त्यावर उपाययोजना करण्यात येईल. नांदगाव शहराला प्रतिव्यक्ती ४० लीटर याप्रमाणे ६ लाख लीटर पाण्याची आवश्यकता आहे. परंतु अतिरिक्त पाणी कुठे जाते याचा शोध घेऊ, अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी नीलेश जाधव यांनी दिली. पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करू पाण्यासाठी शहरवासीयांनी प्रचंड यातना सोसल्या आहेत. त्यामुळे आता तरी प्रत्येकाला पाणी मिळावे, यासाठी अवैध कनेक्शनधारकांवर कारवाई करून शहरवासीयांना पुरेपूर पाणी देण्यासाठी नियोजन करू, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त पाणीपुरवठा सभापती फिरोज खान यांनी दिली.