शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

तहान लागल्यावर खोदणार विहीर; ७०० गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 00:19 IST

जिल्ह्यात यंदा जानेवारी ते जून दरम्यान ७०० गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे.

अमरावती : जिल्ह्यात यंदा जानेवारी ते जून दरम्यान ७०० गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. यासाठी संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये ७३७ उपाययोजना प्रस्तावित आहेत. यासाठी ८ कोटी ७८ लाख ५६ हजार ्नरूपयांचा निधी खर्च होणार आहे. पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई जाणवत नसली तरी दुर्गम भागात तसेच उंचावरील गावे व नादुरूस्त पाणीपुरवठा योजना आदी कारणांमुळे जिल्ह्यातील ७०० गावांना पाणीटंचाईची झळ जाणवणार आहे. पहिल्या टप्प्यात आॅक्टोबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत जिल्ह्यात कुठल्याच गावात पाणीटंचाईची स्थिती नव्हती. दुसऱ्या टप्प्यात जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत ४३६ गावे व वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली. यासाठी जिल्हा परिषदेद्वारा ४५५ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यासाठी ५ कोटी ८२ लाख ५७ हजारांचा निधी खर्च होणार असून तिसऱ्या टप्प्यात एप्रिल ते जून २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील २६४ गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवणार आहेत. यासाठी दोन कोटी ९५ लाख ९९ हजारांचा निधी खर्च होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ११३ गावांमध्ये ११५ नवीन विंधन विहिरी, कुपनलिका करण्यात आल्यात. ११२ नळयोजनांची विशेष दुरूस्ती करण्यात आली. २७ गावांमध्ये तात्पुरत्या नळयोजना सुरू करण्यात आल्यात. ७५ विहिरींमधील गाळ काढण्यात आला. १०१ गावांमध्ये १०७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. काही कामांना अद्याप सुरूवात सुद्धा झाली नसल्याने तहान लागल्यावर विहीर खोदणार का, असा नागरिकांचा सवाल आहे. (प्रतिनिधी)आठ कोटींवर खर्चयंदा पाणीटंचाईच्या कृती आराखड्यामध्ये ८ कोटी ७८ लाख ५६ हजारांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये नवीन विंधन विहिरी व कुपनलिकांसाठी २ कोटी १५ लाख, नळ योजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी ३ कोटी ६५ लाख, तात्पुरत्या नळ योजनेसाठी एक कोटी ४८लाख, टँकरद्वारा पाणीपुरवठ्यासाठी २७ लाख, विहिरींचे खोलीकरण, गाळ काढण्यासाठी ४४ लाख ३० हजार, विहिरी अधिग्रहित करण्यासाठी ७८ लाख ५१ हजारांचा निधी खर्च होणार आहे. एप्रिल ते जून दरम्यान २८२ उपाययोजनापाणीटंचाईची खरी झळ एप्रिल ते जून या कालावधीत पोहोचते. यासाठी कृती आराखड्यात २६४ गावांमध्ये २८२ उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये ७९ गावात ८२ विंधनविहिरी, कुपनलिका, ३० नळयोजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. १३ तात्पुरत्या पुरक नळयोजना, ७ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा, ५८ गावांमधील ६७ विहिरींचे खोलीकरण करून गाळ काढण्यात येणार आहे. तसेच ७७ गावांमध्ये ८३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे.