शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

जिल्ह्यात २८ टँकर,२४४ विहिरी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:21 IST

जिल्ह्यात यंदा भीषण पाणीटंचाईने ग्रामस्थांच्या अडचणीत भर टाकली आहे. जिल्ह्यात सध्या २७ गावांमध्ये २८ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असली तरी टँकरची मागणी दिवसेदिवस वाढत आहे. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी २४४ गावांत २४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमेळघाटात टंचाईच्या झळा तीव्र : अमरावती, अंजनगाव, चांदूर रेल्वे, मोर्शी तालुक्यात गावे तहानली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात यंदा भीषण पाणीटंचाईने ग्रामस्थांच्या अडचणीत भर टाकली आहे. जिल्ह्यात सध्या २७ गावांमध्ये २८ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असली तरी टँकरची मागणी दिवसेदिवस वाढत आहे. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी २४४ गावांत २४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.जिल्ह्यात यावर्षी तीव्र दुष्काळ आहे. शहरात नळाला दोन दिवसांआड पाणी येते, तर ग्रामीण भागात अतिशय विदारक परिस्थिती आहे. पूर्वी केवळ मेळघाटात टँकरद्वारे पाणीपुरवठा व्यवस्था करावी लागायची. यावर्षी मेळघाटातील गावांसह अमरावती, चांदूर रेल्वे, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, मोर्शी तालुक्यांतील गावांमध्येही पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील २७ गावे आज टँकरवर आहेत. चिखलदरा तालुक्यातील भिलखेडा, कोयलारी, पाचडोंगरी, धरमडोह, बहादरपूर, मनभंग, आडनदी, सोनापूर, पिपादरी, खिरपाणी, खटकाली, खडीमल, सोमवारखेडा, मलकापूर, कोरडा, तारूबांदा, लवादा, भांद्री या गावांसह चांदूर बाजारमधील घाटलाडकी, गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.अमरावती तालुक्यातील बोडणा, परसोडा, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोना, चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर, जळका जगताप, मोर्शी तालुक्यातील लेहेगाव, सावरखेड, आसोना आणि वाघोली आदी गावांमध्ये टँकर सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रीतेश मुंडे यांनी दिली. सदर गावांची तहान टँकरद्वारे भागविण्यात येत आहे. साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या आमला विश्वेश्वर या गावात तीन हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर दिवसातून दोन वेळा पाणी आणून गावातील टाकीत भरतात. दोन्ही टाकीतील पाणी आठवड्यातून एक दिवस नळावाटे गावात पुरवले जाते. गावात सध्या एकच हातपंप आहे. त्याचे पाणीदेखील आटले आहे. जळका जगताप या गावातही दोन दिवसांत टँकर येतो. टँकरचे पाणी टाकीत सोडले जाते. आठवड्यातून एक दिवस नळावाटे येणारे पाणी केवळ अर्धा तास पुरविले जाते, अशी ग्रामस्थांची ओरड आहे. सद्यस्थितीत मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या गावांची संख्या वाढली आहे, तर विहीर अधिग्रहणाची जिल्ह्यातील संख्या २४४ वर पोहोचली आहे. यावरून पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे.विशेष दुरुस्तीची ७० गावात ७० कामेतात्पुरत्या पूरक नळ योजनांची कामे जिल्हाभरातील ३८ गावांत सुरू आहेत. नळ योजनांची विशेष दुरुस्तीची ७० गावांत ७० कामे केली जात आहेत. यामधील काही कामे पूर्ण झाली असून, काही ठिकाणी कामे प्रगतिपथावर असल्याचे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी सांगितले.