शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

जिल्ह्यात २८ टँकर,२४४ विहिरी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:21 IST

जिल्ह्यात यंदा भीषण पाणीटंचाईने ग्रामस्थांच्या अडचणीत भर टाकली आहे. जिल्ह्यात सध्या २७ गावांमध्ये २८ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असली तरी टँकरची मागणी दिवसेदिवस वाढत आहे. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी २४४ गावांत २४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमेळघाटात टंचाईच्या झळा तीव्र : अमरावती, अंजनगाव, चांदूर रेल्वे, मोर्शी तालुक्यात गावे तहानली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात यंदा भीषण पाणीटंचाईने ग्रामस्थांच्या अडचणीत भर टाकली आहे. जिल्ह्यात सध्या २७ गावांमध्ये २८ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असली तरी टँकरची मागणी दिवसेदिवस वाढत आहे. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी २४४ गावांत २४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.जिल्ह्यात यावर्षी तीव्र दुष्काळ आहे. शहरात नळाला दोन दिवसांआड पाणी येते, तर ग्रामीण भागात अतिशय विदारक परिस्थिती आहे. पूर्वी केवळ मेळघाटात टँकरद्वारे पाणीपुरवठा व्यवस्था करावी लागायची. यावर्षी मेळघाटातील गावांसह अमरावती, चांदूर रेल्वे, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, मोर्शी तालुक्यांतील गावांमध्येही पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील २७ गावे आज टँकरवर आहेत. चिखलदरा तालुक्यातील भिलखेडा, कोयलारी, पाचडोंगरी, धरमडोह, बहादरपूर, मनभंग, आडनदी, सोनापूर, पिपादरी, खिरपाणी, खटकाली, खडीमल, सोमवारखेडा, मलकापूर, कोरडा, तारूबांदा, लवादा, भांद्री या गावांसह चांदूर बाजारमधील घाटलाडकी, गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.अमरावती तालुक्यातील बोडणा, परसोडा, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोना, चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर, जळका जगताप, मोर्शी तालुक्यातील लेहेगाव, सावरखेड, आसोना आणि वाघोली आदी गावांमध्ये टँकर सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रीतेश मुंडे यांनी दिली. सदर गावांची तहान टँकरद्वारे भागविण्यात येत आहे. साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या आमला विश्वेश्वर या गावात तीन हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर दिवसातून दोन वेळा पाणी आणून गावातील टाकीत भरतात. दोन्ही टाकीतील पाणी आठवड्यातून एक दिवस नळावाटे गावात पुरवले जाते. गावात सध्या एकच हातपंप आहे. त्याचे पाणीदेखील आटले आहे. जळका जगताप या गावातही दोन दिवसांत टँकर येतो. टँकरचे पाणी टाकीत सोडले जाते. आठवड्यातून एक दिवस नळावाटे येणारे पाणी केवळ अर्धा तास पुरविले जाते, अशी ग्रामस्थांची ओरड आहे. सद्यस्थितीत मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या गावांची संख्या वाढली आहे, तर विहीर अधिग्रहणाची जिल्ह्यातील संख्या २४४ वर पोहोचली आहे. यावरून पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे.विशेष दुरुस्तीची ७० गावात ७० कामेतात्पुरत्या पूरक नळ योजनांची कामे जिल्हाभरातील ३८ गावांत सुरू आहेत. नळ योजनांची विशेष दुरुस्तीची ७० गावांत ७० कामे केली जात आहेत. यामधील काही कामे पूर्ण झाली असून, काही ठिकाणी कामे प्रगतिपथावर असल्याचे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी सांगितले.