शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात गावबंदी आता मतदानासाठी आवतण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:11 IST

अमरावती : जिल्ह्यातील ५३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा धुराळा मागील उडत होता. आता प्रत्यक्ष मतदानाचा दिवस तोंडावर आला आहे. ...

अमरावती : जिल्ह्यातील ५३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा धुराळा मागील उडत होता. आता प्रत्यक्ष मतदानाचा दिवस तोंडावर आला आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये गावबंदी करणारे उमेदवार, कार्यकर्ते मतदानासाठी गावाला या म्हणून हात जोडून विनवणी सुरू आहे.

ग्रामीण भागातील लोक पुणा, मुंबई व इतर शहरांत कामानिमित्त वास्तव्याला आहेत. कोरोना संकटात हेच कामगार गावाकडे येण्यासाठी धडपडत होते. परंतु अनेक गावांमध्ये प्रवेशबंदी लादली गेली. त्यावेळी कामगार चांगलेच त्रस्त झाले होते. गावातील कार्यकर्ते नागरिकांना, कामगारही परका वाटत होता. विनोदी संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत हाेते. मात्र, आता परगावी गेलेल्या कामगारांची मते आपल्या झोळीत पडावी यासाठी हेच उमेदवार अन कार्यकर्ते आता मनधरणी करताना दिसून येत आहे. म्हणूनच गल्ली ते दिल्ली असे समीकरण असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगूल वाजल्यापासून मतांचा जोगवा मागण्यासाठी व मतांची जुळवाजुळव करण्यासाठी कार्यकर्ते उमेदवारांना पुणे मुंबई व अन्य शहरांत गेलेल्या मतदार राजाला शोधून गावात येण्याची विनवणी करावी लागत आहे. अशा तऱ्हेने ग्रामीण भागातील विविध ग्रामपंचायतींच्या आणि विशेषतः मोठ्या गावांत निवडणूक चुरशीची होणार असून, ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याच पक्ष व गटाला कशी मिळेल, यासाठी अनेक प्रतिष्ठितांनी कंबर कसली आहे.

बॉक्स

अनेकांनी केलेली वाहनांची व्यवस्था

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये चुरशीच्या लढती होत असल्याने प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे बाहेर ठिकाणी राहणाऱ्या मतदारांना मतदानासाठी यावे, असे साकडे उमेदवार व त्याचे समर्थक घालीत आहेत. त्यासाठी उमेदवारांकडून खास वाहनांची व्यवस्था करून मतदारांना नेणे व आणण्याची जबाबदारीसुद्धा उचलली जात आहे.