शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

्नराजकीय अस्तित्वाच्या लढाईत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा बळी

By admin | Updated: March 10, 2016 00:27 IST

फुलांचा मार्ग मिळवण्याच्या आशेवर बरेचदा काटेरी वाटही तुडवावी लागते. अन त्या तीक्ष्ण काटेरी वाटेवर पाऊलेही रक्तरंजीत होतात.

मनोज मानवतकर नांदगाव खंडेश्वरफुलांचा मार्ग मिळवण्याच्या आशेवर बरेचदा काटेरी वाटही तुडवावी लागते. अन त्या तीक्ष्ण काटेरी वाटेवर पाऊलेही रक्तरंजीत होतात. असाच प्रसंग तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या धामक येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर ओढवला आहे. गावात सुरू असलेल्या राजकीय अस्तित्वाच्या लढाईत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचाच बळी जात आहे. तीन हजार लोकसंख्या असलेले धामक हे गाव. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत जमिनीचे क्षेत्रफळ अधिक. या गावातील शेतकऱ्यांकडे ४ हजार २५० एकर जमीन आहे. बहुतांश जमीन ओलिताखाली आहे. परंतु दरवर्षी महापुराचा वेढा या गावाला होत असल्याने सन २००२ मध्ये शासनाने ग्रामस्थाचे एक किलोमिटर अंतरावर पुनर्वसन केले. परंतु या प्रक्रियेमध्ये तब्बल १४ वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरीच भरडला जात आहे. धामक येथे ५५१ कुटूंब वास्तव्याला आहेत. यापैकी २१५ कुटुंबांचाच पुनर्वसनात समावेश झाला. त्यामुळे उर्वरित कुटुंंबांना पुनर्वसनात समावेश होतो की नाही, याबाबत शंकाच होती. पण, २८ आॅगस्ट २०१५ रोजी संपूर्ण धामक गावाचा पुनर्वसनात समावेश करुन धामक गावाला ‘मॉडेल’ गाव बनविणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. त्यामुळे धामकमधील उर्वरित कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या आशा पल्लवित झाल्या व प्रशासनानेही कामकाजाचा वेग वाढविला. पण, गावात आपलेच राजकीय अस्तित्व राहावे, या स्वार्थापायी गावातील दोन्ही राजकीय गटांनी वेगवेळ्या ठिकाणी पुर्नवसनाची मागणी केली. यामध्ये शेतकऱ्यांचे हित कोठेच जोपासले गेले नाही, हे विशेष. येथील शेतकऱ्यांची बहुतांश जमिन नवीन पुनर्वसनानजीक असल्याने सन २००२ मध्ये स्थापित पुनर्वसनातच समावेश व्हावा, अशी १३१ शेतकऱ्यांची मागणी आहे. तीन वर्षांपासून सतत दुष्काळी स्थिती आहे. तरी येथील शेतकरी मात्र ओलिताची सोय असल्यामुळे समृद्ध आहे. परंतु गावानजीकच्या जमिनीपासून हा शेतकरी १० किमी. अंतरावर पुनर्वसित झाला तर त्यांना शेती करणे फार अडचणीचे होईल.पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मागील सहा महिन्यात प्रशासकीय पातळीवर आयुक्त, जिल्हाधिकारी, एचडीओ विविध अधिकारी तसेच पालकंमत्री, खासदार, आमदारांनी गावाला भेटी देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण, गावातील राजकीय दुहीमुळे सर्व प्रयत्न फोल ठरले. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी ५ मार्च रोजी गावातच आमसभा घेऊन ५०० नागरिक ज्या बाजूने निर्णय देतील त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आता पुनर्वसनाचा निर्णय धामकवासीयांनाच घ्यावयाचा आहे. नेमका कोणता निर्णय होतो, याकडे नजरा आहेत.