शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नवीन शैक्षणिक धोरणात एम.फिल.पदवीचे मूल्य शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 13:16 IST

Amravati News education केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणात एम.फिल.ला केराची टोपली दाखविली असून, या पदवीचे मूल्य शून्य करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकाही महाविद्यालयांत प्रवेशाची धूम

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणात एम.फिल.ला केराची टोपली दाखविली असून, या पदवीचे मूल्य शून्य करण्यात आले आहे. असे असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने काही महाविद्यालयांना सन २०२१-२०२२ या शैक्षणिक सत्रात एम.फिल. प्रवेशाची मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुल करण्याचा धंदा असल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे.

गतवर्षी एम.फिल अभ्यासक्रम निकालाने विद्यापीठात गोंधळ निर्माण झाला होता. आता तर सरकारने नवीन शैक्षणिक धोरणनात एम.फिल. पदवीचे मूल्य शून्य केले आहे. एम.फिल.पेक्षा पीएच.डी.ला प्राधान्य देण्यात आले आहे. तरीही काही महाविद्यालयांनी एम.फिल. प्रवेशाच्या नावे विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी नव्या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्याची शक्कल लढविली आहे. एम.फिल. पदवी प्रदान करून विद्यार्थी करतील तरी काय, असा सवाल शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासकांचा आहे. एम.फिल पदवीला नवीन शैक्षणिक धोरणात कवडीची किंमत ठेवण्यात आली नाही. तरीही काही महाविद्यालयांनी प्रवेशाचा अट्टाहास चालविल्याचे चित्र आहे. राज्यात केवळ नागपूर व अमरावती विद्यापीठातच एम.फिल सुरू असल्याची माहिती आहे.

एम.फिल प्रवेशपूर्व परीक्षेसाठी तगादा

काही महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे एम.फिल. प्रवेशपूर्व एमपेट परीक्षा घेण्यासाठी तगादा लावल्याची माहिती आहे. वास्तविकता नवीन शैक्षणिक धोरणात एम.फिल. रद्द केल्याचे कटू सत्य आहे. केवळ प्रवेशातून शुल्क मिळविणे एवढाच हेतू महाविद्यालयांचा असल्याचे दिसून येते.

पीएच.डी.मुळे एमफिलची गरज संपली

नवीन शैक्षणिक धोरणात पदवीनंतर पीएच.डी. करायची असल्यास चार वर्षांची पदवी आणि नोकरी करायची असल्यास त्यांना तीन वर्षांची पदवी, असा उल्लेख आहे. त्यामुळे पीए्.डी. असल्यास यापुढे एम.फिल.ची गरज असणार नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे. नवीन शैक्षणिक धोरणात पदवी, पदव्युत्तर मध्येच एमफिलमधील संशोधन अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे.

- संजय खडक्कार,

राज्यपाल नामित सदस्य परीक्षा मंडळ,

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र