शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रणमुक्त युरिया पोहोचणार ५६८ रुपयांवर!

By admin | Updated: February 15, 2015 00:12 IST

काही वर्षांपासून युरिया शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर राजकीयदृष्ट्या कळीचा मुद्दा बनला आहे. आता तर केंद्र सरकारद्वारा पुढील तीन वर्षात ...

अमरावती : काही वर्षांपासून युरिया शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर राजकीयदृष्ट्या कळीचा मुद्दा बनला आहे. आता तर केंद्र सरकारद्वारा पुढील तीन वर्षात रुरिया टप्प्याटप्प्याने नियंत्रणमुक्त करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती आहे. असे झाल्यास नियंत्रणमुक्त युरियाची ५० किलोची बॅगस तब्बल ५६८ रूपयांना शेतकऱ्यांना खरेदी करावी लागणार आहे. याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. रासायानिक खतेविषयक मंत्रालयाने तयार केलेल्या योजनेत खरीप व रबी हंगामापूर्वी प्रतिवर्षी १० टक्के युरियाची किंमत वाढविली जाणार आहे. सध्या २८४ रूपयांत युरियाची बॅग विक्री होत आहे. यामध्ये ५० टक्के सबसीडी अंतर्भूत आहे. जन धन योजना व आधारकार्डाचा उपयोग करून यासंबंधीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ळे पोहचविण्याची शासनाची योजना असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु युरिया खरेदी करतेवेळी दुकानदारास रोख रक्कम द्यावी लागणार आहे. आधीच युरियाच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. त्यात किमती वाढल्यास शेतकऱ्यासमोर नवीन संकट उभे राहणार आहे. युरियाचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी केंद्र सरकार या प्रस्तावाला मंजुरी देणार असल्याची शक्यता आहे, असे झाल्यास शेतकऱ्यांना अनेक समस्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होईल. (प्रतिनिधी)