शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील तीन मोठे प्रकल्प शंभर टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:13 IST

गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भातील तीन मोठे प्रकल्प शंभर टक्के भरल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

ठळक मुद्देचार प्रकल्पांचे दरवाजे उघडले पाण्याचा विसर्ग सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भातील तीन मोठे प्रकल्प शंभर टक्के भरल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारा अप्पर वर्धा धरण गेल्या आठवड्यातच शंभर टक्के भरले होते. पूर्वी धरणाचे तीन दरवाजे उघड्यात आले होते. आता मंगळवारपासून १० सेंमीने पाच दरवाजे उघडण्यात आले असून, वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाचा मानला जाणारा बेंबळा हा मोठा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. या प्रकल्पाचे १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले असून, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पसुद्धा शंभर टक्के भरला असून, १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पात ९८.२३ टक्के पाणीसाठा साचल्यामुळे १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जलसंपदा विभागाने घेतलेल्या पाणीसाठ्याच्या नोंदीनुसार चार प्रकल्पांचे गेट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सुद्धा सतर्क करण्यात आले आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ४५.०३ टक्के पाणीसाठा साचला आहे. अरुणावती प्रकल्पात सर्वात कमी १३.३४ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यतील काटेपूर्णा प्रकल्पात फक्त २४.३० टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात मागील वर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. पेनटाकळी प्रकल्पात चांगला पाणीसाठा साचला असला तरी नळगंगा प्रकल्पात ३८.४९ टक्के पाणीसाठा आहे. खडकपूर्णा प्रकल्प शुन्य टक्यांवरून आता ५.१६ टक्क्यांवर गेला आहे. एकूण नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ७१.८२ टक्के पाणीसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ७०.१९ टक्के पाणीसाठा आहे. ४६९ प्रकल्पांत सरासरी ४९.९५ टक्के पाणीसठा साचला असून मध्यम, मोठे व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६३.९१ टक्के पाणीसाठा साचला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.पाच मध्यम प्रकल्प शंभर टक्केयंदा पाच मध्यम प्रकल्पांत शंभर टक्के पाणीसाठा साचला आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, नवरगांव, बुलडाणा जिल्ह्यतील ज्ञानगंगा, मस, पलढग प्रकल्पांचा समावेश आहे, तर अमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात सद्यस्थितीत ९५.७४ टक्के पाणीसाठा आहे. पाच सेंमीने चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. चंद्रभागा प्रकल्पात ९५.४७ टक्के पाणीसाठा असून, १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले. पूर्णा ९१.८९ टक्के १५ सेमींने दोन दरवाजे उघडले आहेत. सपन प्रकल्पात ९६.२७ टक्के पाच सेंमीने चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यवतमाळमधील बोरंगाव ९७.४३ टक्के, बुलडाणामधील तोरणा ९८.१० टक्के सदर प्रकल्प शंभर टक्याच्या वाटेवर आहेत.

टॅग्स :Waterपाणी