शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पोहरा अभयारण्याच्या निर्मितीत आडकाठी

By admin | Updated: March 12, 2015 00:55 IST

पोहरा- मालखेड या विर्स्तीण जंगलात अभयारण्य निर्माण करण्याचा दिशेने शासनाने पाऊल उचलले असतानाच स्थानिक गावकरांनी त्याला जोरदार विरोध केला आहे.

अमरावती : पोहरा- मालखेड या विर्स्तीण जंगलात अभयारण्य निर्माण करण्याचा दिशेने शासनाने पाऊल उचलले असतानाच स्थानिक गावकरांनी त्याला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे प्रस्तावित अभयारण्याचा निर्णय घोषित करण्याच्या टप्प्यात असताना यात आडकाठी आली आहे. प्रस्तावित अभयारण्यात २३ गावांचा समावेश असल्याची माहिती आहे.वडाळी आणि चांदुर रेल्वे वनपरिक्षेत्रात जंगलात वाघ वगळता अन्य वन्यप्राणी आहे. त्यांचे संगोपन, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून १० वर्षांपुर्वी मालखेड- पोहरा अभयारण्य निर्माण करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. अभयारण्य निर्माण झाल्यास केंद्र शासनाच्या विविध योजनांचा गावकरांना लाभ मिळेल, या अनुषंगाने २३ गावे कायम ठेवत अभयारण्य निर्माण करण्यासाठी गावकरी, ग्रामपंचायतची मते जाणून घेतल्या गेली. १६ हजार व्यक्तींची अभयारण्य निर्मितीसाठी मते जाणून घेताना ९ ते १० हजार नागरिकांनी अभयारण्य नकोच ही भूमिका घेतली. सर्वेक्षणाअंती गावकऱ्यांच्या हरकती शासनाला कळविल्या असता राज्याचे प्रधान वनसचिवांनी अभयारण्य निर्मितीबाबत गावकऱ्यांच्या मनात असलेली भीती, संशयकल्लोळ, गैरसमज दूर करण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले आहे. अभयारण्यामुळे पर्यारवणास चालना मिळण्यासह विकासाची दारे खुलतील, अशी गावकऱ्यांची समजूत घालून मते परिवर्तीत करण्याचा सल्ला वनविभागाला देण्यात आला. नागरिकांची हरकत असल्याशिवाय अभयारण्य निर्माण शक्य नाही, असे वनसचिवांनी स्पष्ट केले आहे. मागील १० वर्षांपुर्वी झालेल्या सर्वेक्षणाला मूर्त रुप देण्याची वेळ आली असता गावकऱ्यांच्या हरकतींनी अभयारण्याच्या निर्मितीत बाधा टाकल्याचे बोलले जात आहे. शहरालगतच्या भागात खासगी व्यक्तींनी जमिनी मालमत्ता म्हणून घेवून ठेवल्या आहेत. अभयारण्य झाल्यास या जमिनी अभयारण्यात जातील, या भितीने अनेक जमिन मालकांनी सुद्धा अभयारण्य होऊ नये, यासाठी गावकऱ्यांना चुकीची माहिती पसरविण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली असल्याचे दिसून येते. खरे तर अभयारण्य निर्माण झाल्यास गावकऱ्यांना शासनाच्या अनेक योजनांचा फायदा मिळेल. मात्र, अभयारण्याबाबत गावकऱ्यांमध्ये चुकीचा समज निर्माण केल्यामुळे अनेकांनी अभयारण्य निर्मितीला नकार दिला, हे खरे आहे. (प्रतिनिधी)या गावांचा होईल समावेशप्रस्तावित वडाळी- मालखेड अभयारण्य निर्माण झाल्यास २३ गावांचा समावेश होणार आहे. त्यानुसार सर्वेक्षण सुद्धा झाले असून यात पोहरा, मासोद, इंदला, बोडणा, शेवती, सावर्डी, भानखेड (मोठे), कस्तुरा, मोगरा, सावंगा, चिरोडी, कारला, चिखली, मार्डी, पिंपळखुटा, हातला, कोंडेश्वर, अंजनगाव बारी, घातखेडा, पार्डी, गोंविदपूर, भानखेडा (लहान), मालखेड, लालखेड गावांचा समावेश राहिल.मोर, बिबट्याच्या संगोपनाचे उद्दिष्टवडाळी, मालखेडच्या विर्स्तीण जंगलात मोठ्या प्रमाणात मोर, बिबट्याची संख्या आहे. एवढेच नव्हे तर निलगाय, हरिण, काळवीट, रानडुक्कर, ससे, तरसा, गवा, लांडगे, कोल्हे आदी वन्यप्राण्यांचे संगोपनाचे उद्दिष्ट पुढे करुन अभयारण्याचा प्रस्ताव आहे.काठेवाडी गुरांनी केली जमिन पडीकवडाळी वनपरिक्षेत्रात अनेकांची शेती आहे. मात्र काही वर्षांपासून या भागात मोठ्या संख्येनी काठेवाडी गुरांचा संचार असल्याने अनेकांनी शेती करण्याचा भानगडीत न पडता ती पडीक ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. वडाळी, पोहरा हा परिसर संपूर्ण जंगलाचा नसून अनेकांची शेती असल्याचे सर्वेक्षणादरम्यान स्पष्ट झाले आहे.