शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा, केळी, कपाशीवर आघात

By admin | Updated: October 1, 2014 23:16 IST

नैसर्गिक आपत्तींमुळे २०१४ हे वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत त्रासदायक ठरले. मृग नक्षत्राच्या सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांनी धक्क्यावर धक्के दिले. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या गर्तेत अडकला. कर्जाच्या विवंचनेत

अरुण पटोकार - पथ्रोटनैसर्गिक आपत्तींमुळे २०१४ हे वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत त्रासदायक ठरले. मृग नक्षत्राच्या सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांनी धक्क्यावर धक्के दिले. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या गर्तेत अडकला. कर्जाच्या विवंचनेत त्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. चांदूरबाजार तालुक्यातील एका संत्राबागाईतदाराने आत्महत्या केल्याने ही बाब स्पष्ट झाली आहे. दीड महिना पावसाने दांडी मारल्याने पेरणीला विलंब झाला. परिणामी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता बळावली आहे. कशीबशी उशिराने पेरणी आटोपली. पण, लगेच जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली. हा निसर्गाने दिलेला पहिला धक्का. दुबार पेरणी करून शेतकऱ्यांनी कसेबसे सोयाबीन, कपाशी, तुरीचे पीक उभे केले. त्यावर पुन्हा निसर्गाचा कोप झाला. सोयाबीनवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे पीक बुडण्याच्या मार्गावर आहे. मर रोगाने तुरीची झाडे सुकत आहेत. कपाशीवरही रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांच्या फांद्या वाळत आहेत. हा शेतकऱ्यांना निसर्गाने दिलेला दुसरा धक्का. मध्यंतरी झालेल्या वादळी पावसामुळे पथ्रोट, पांढरी खानमपूर, अंजनगाव सुर्जी, परिसरातील काही केळीबागा भुईसपाट झाल्या. त्यामध्ये मोजक्याच बागाईतदारांच्या बागा सुदैवाने बचावल्या. पण, निसर्गाने त्यांच्यावर घाला घातलाच. शिल्लक राहिलेल्या केळीच्या बागांवर दव व अज्ञात रोगाने आक्रमण केले. यामुळे बागेतील लहान-लहान व अर्धवट पिकलेली केळी पिवळी व काळी पडली आहेत. झाडांवरील घडही तुटून पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हा तिसरा धक्का पोहचला आहे. संत्रा बागाईतदारांची स्थिती त्याहूनही बिकट आहे. वातावरणातील बदल व अज्ञात रोगामुळे मोर्शी, वरूड, चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सर्वच संत्रा बागांमधील हिरवी व पिवळी संत्री गळून पडू लागली आहेत. संत्रा हे रोखीचे पीक आहे. त्यामुळे या पिकाच्या भरवशावर मोठमोठे व्यवहार, कर्जांची देवाणघेवाण आदी केले जातात. मात्र, शासनाकडून नुकसान भरपाई देताना टाळाटाळ केली जाते. शेतकऱ्याला वरून निसर्गाचा व खालून शासनाचा मार सोसावा लागतो. ही शेतकऱ्यांची कुचंबणाच नाही काय, असा सवाल उपस्थित होत आहे.