शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

'सावली'साठी त्या वृद्धाची पायपीट !

By admin | Updated: March 7, 2016 00:04 IST

पायाचे दुखणे घेऊन जीवनाचा गाडा चालविणारा तो वृध्द सावलीच्या शोधात रस्ता ओलांडून दुभाजकावरील वृक्षाचा आसरा घेतो.

परिचर्या वसतिगृहासमोरील प्रकार : कुटुंबाने नाकारले, समाजाने झिडकारले, मग जायचे कुठे ?अमरावती : पायाचे दुखणे घेऊन जीवनाचा गाडा चालविणारा तो वृध्द सावलीच्या शोधात रस्ता ओलांडून दुभाजकावरील वृक्षाचा आसरा घेतो. सायंकाळी उतरते ऊन्ह अंगावर पडताच पुन्हा रस्ता ओलाडून फुटपाथवर जातो, अशी ही त्या वृद्धाची पायपीट दररोजच सुरू असते. इर्विन चौकातील परिचर्या वसतिगृहासमोर हा प्रकार ये-जा करणाऱ्यांना पहायला मिळत आहे. मात्र, आजपर्यंत त्या वृध्दाला आधार देण्याकरिता प्रशासन किंवा सामाजिक संघटना सरसावल्या नाहीत, ही शोकांतिका अमरावती शहरात पाहायला मिळत आहे. पाच वर्षांपासून इर्विन चौकातच भीक मागणारे राजाराम वसंत बोपशेट्टी (६०) हे बुधवारा परिसरात राहत होते. आई-वडिलांच्या छत्रछायेत जगत असताना राजाराम हे घराच्या आवारात पाय घसरून पडले. त्यांच्या कंबरेचे हाड मोडले, तेव्हापासून त्यांच्या जीवन संकटमय झाले. कंबरेचा हाड मोडले होते. मात्र, परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांनी इर्विनमध्ये उपचार सुरू केले. मात्र, कंबरेच्या दुखण्यातून त्यांना अखेर कायमचे अपंगत्व आले. त्यातच आई-वडील वारल्यानंतर दु:खांचे दिवस सुरू झाले. तुटक्या घरात राहणार तरी किती दिवस, असा विचार करून राजाराम यांनी पाच वर्षांपूर्वी भीक मागणे सुरू केले. त्यासाठी इर्विन चौक हा वर्दळीचे ठिकाण त्यांनी निवडले. इर्विन चौकातील अन्नकुटावर जीवनाचा प्रवास सुरू केला. जेवण मिळाले मात्र, छत नाही, छत नाही तर सावली कशी मिळणार, अशी स्थिती राजाराम यांच्यासमोर निर्माण झाली. मात्र, त्याचाही जालीम उपाय त्यांनी शोधला. सकाळी ऊन्ह पडल्यावर दुभाजकावरील वृक्षांची सावली रस्त्यावर पडते. त्यामुळे राजाराम हे पाय घासत हाताच्या साह्याने रस्ता ओलांडून दुभाजकाजवळ जातात, तेथील वृक्षांच्या सावलीत बसतात किंवा कधीकाळी झोपतातदेखील. मात्र, सायंकाळी मावळत्या सूर्याची किरणे अंगावर पडताच पुन्हा रस्ता पाय घासत हाताच्या बळावर पुन्हा रस्ता ओलांडून परिचर्या वसतिगृहासमोरील फुटपाथवर येतात. दरम्यान, त्यांचे जेवण आणून देण्यासाठी एक महिला वृध्द भिकारीसुध्दा सोबतीला असते. ती वृध्दा जालना येथील असल्याचे सांगत असून ती आपले नाव मीरा महाजन सांगते. राजाराम व मीरा हे दोघेही संगतीने जेवणसुध्दा करतात. (प्रतिनिधी) या निराधार वृद्धांची जबाबदारी कुणाची ?अमरावतीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना निराधारांना आधार देणार कोणी नाही. प्रशासन विकास कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात, त्यातच सामाजिक दायित्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या संस्था विविध उपक्रमांद्वारे निराधारांचे पुनर्वसनसुध्दा करतात. मात्र, शहरात विविध ठिकाणी भीक मागणाऱ्या निराधार वृध्दाकडे कोणी का लक्ष पुरवित नाही, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.