शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत शिपाई नाही, विद्यार्थीच करतात झाडलोट

By admin | Updated: December 22, 2016 00:40 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शिक्षण सक्तीचे केलेले असले तरी तालुकयातील एकाही शाळेत शिपाई नसल्याने त्यांची कामे विद्यार्थ्यांना करावी लागत आहे.

सक्तीच्या शिक्षणाची माती : मूळ उद्देशालाच हरताळ, नियमात बदल हवा सुनील देशपांडे अचलपूर सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शिक्षण सक्तीचे केलेले असले तरी तालुकयातील एकाही शाळेत शिपाई नसल्याने त्यांची कामे विद्यार्थ्यांना करावी लागत आहे. तर लिपिक नसल्याने कारकुनी कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. त्यामुळे सक्तीचे शिक्षण कुणासाठी आणि कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्र शासनाने सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला असला तरी अचलपूर तालुक्यातील एकाही शाळेत शिपाई नाही. अनेक ठिकाणी तर विद्यार्थीच शाळा उघडतात. घंटा वाजवितात. शाळा स्वच्छ करतात, वर्गखोल्यांची झाडलोट करतात, असे चित्र आहे. तालुक्यात जि.प.च्या १२९ शाळा असून त्यात अंदाजे १८ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील बहुतांश विद्यार्थी गोरगरीब, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांच्या मुलांवर शिपायांची कामे करायची वेळ आली आहे. हेच का गोरगरीबांसाठी सक्तीचे शिक्षण, असे जनतेचे म्हणणे आहे. एकीकडे शाळांच्या स्वच्छतेसाठी कर्मचारी नाहीत आणि दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी विविध अटी शासनाने लादलेल्या असताना देखील ही स्थिती आहे. अशा स्थितीत शाळेत विद्यार्थी येणार कोठून आणि आले तरी ते नियमानुसार आखलेल्या आकड्यांच्या चौकटीत बसतील काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्राथमिक शिक्षणात संबंधित विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबुत व्हावयास हवा. परंतु, तसे होताना दिसत नाही. १२ ते १५ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी मोठी गर्दी राहात असे. पण, मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. ती वाढावी यासाठी शासनाकडून वेळोवेली शिक्षणाशीी संबंधीत योजना राबविल्या जात आहेत. प्राथमिक शाळा सेवाशर्ती नियमावली १९८१ मध्ये वर्ग १ ते ४ साठी केवळ चार शिक्षकच मंजूर करण्यात आले आहेत. ज्या शाळेत ५०० पेक्षा कमी विद्यार्थी असतील तेथे विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची कोणतीच सोय नाही. या शाळेच्या आत व बाहेर स्वच्छतेसाठी, झाडलोट करण्यासाठी तसेच बालकांशी निगडित समस्यांसाठी शिपाईच काय तर लिपिकाचीसुद्धा तरतूद नाही. ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर मात्र शिपायाची सोय असते. म्हणजेच कमी विद्यार्थी असल्यास शाळा स्वच्छ राहिली काय किंवा नाही, अथवा शिक्षकांवर लिपिकाच्या कामाचा बोजा पडला तरी चालेल, अशी शासनाची भूमिका आहे. यामुळे विद्यार्थ्यांचेच शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी आहे. मागणीला जोर वर्ग एक ते चारसाठी विनाअट माध्यमिक शाळांप्रमाणे प्राथमिक शाळेलाही स्वतंत्र मुख्याध्यापक, कार्यालयीन कामासाठी कनिष्ठ लिपिक व शिपाई नियुक्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे. ज्या शाळांची पटसंख्या १००च्या वर आहे त्या शाळांमध्ये शिपाई व लिपिक ही दोन पदे आवश्यकत आहेत. झाडलोट किेंवा शिपायाची कामे आम्ही किंवा शिक्षक विद्यार्थ्यांकडून करून घेत नाही. खिचडी शिजविणाऱ्यांना मोबदला देऊन ती कामे करावी लागतात. - रावसाहेब मोरे, तालुका, कास्ट्राईब शिक्षक संघटना