शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त गावे, प्रस्ताव तयार करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:11 IST

अमरावती : जिल्ह्यातील काही गावांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा शुक्रवारी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत ...

अमरावती : जिल्ह्यातील काही गावांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा शुक्रवारी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत चांगलाच गाजला. अखेर या टंचाईग्रस्त गावात तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत.

दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात मेळघाटसह अन्य तालुक्यांतील काही गावांत नागरिकांना पिण्याच्या पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अद्याप उन्हाळा लागला नसला तरी मेळघाटातील एकझिरा आणि धामनगाव रेल्वे तालुक्यातील आजनगाव येथे नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे, तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. परिणामी, वरील गावांना तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. याबाबत प्रशासकीय यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही तातडीने उपाययोजना होत नाही. मेळघाटातील काही गावांत दरवषीच पाणीटंचाई भेडसावते. त्यामुळे या गावांत कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत सभापती दयाराम काळे, सदस्या अनिता मेश्राम यांनी सभागृहात मांडले. सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेत अध्यक्षांनी टंचाईग्रस्त गावांचा तातडीने प्रस्ताव तयार करून या ठिकाणी उपाययोजना करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांना दिले आहेत. यावेळी जलसंधारण विभागाशी संबंधित प्रश्न सदस्या गौरी देशमुख यांनी मांडले. कृषी, महावितरण, आदी विभागाच्या प्रश्नांवर वादळी चर्चा झाली. सभेला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सदस्या पूजा होडोळे, वासंती मंगरोळे, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, कॅफो चंद्रशेखर खंडारे, जलसंधारण अधिकारी शिरीष तट्टे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

बॉक्स

बोंडसळ नुकसानीच्या सर्व्हेचा ठराव

जिल्ह्यात यंदा पावसामुळे मृूग, उडीद, सोयाबीन या पिकांसोबतच कपाशीवर आलेल्या बोंडसळ रोगाच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचे नुकसान झाले आहे, परंतु या नुकसानाबाबत प्रशासनाकडून काय उपाययोजना करण्यात आल्यात, असा प्रश्न कृषी अधिकाऱ्यांना अध्यक्षांनी विचारला. यावर बोंडसळमुळे कपाशीच्या झालेल्या नुकसानीबाबत पंचनामे करण्याबाबत शासनाचे आदेश नाहीत. त्यामुळे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, असा ठराव जलव्यवस्थापन समितीत पारीत करण्यात आला आहे.