शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

रेल्वे गाङ्यांमध्ये आरक्षण ‘नो- रुम’

By admin | Published: October 22, 2014 11:12 PM

नोकरदार, आप्तस्वकीय दिवाळी साजरी करण्यासाठी गावी पोहचले आहेत. मात्र दिवाळीचा उत्सव आटोपताच परतीचा प्रवासाला जाताना रेले गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण झाले आहे.

अमरावती : नोकरदार, आप्तस्वकीय दिवाळी साजरी करण्यासाठी गावी पोहचले आहेत. मात्र दिवाळीचा उत्सव आटोपताच परतीचा प्रवासाला जाताना रेले गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आरक्षण ‘नो-रुम’ दाखवीत असल्याने दिवाळीसाठी आलेल्यांना परत कसे जावे, याची चिंता लागली आहे. त्यामुळे तत्काळचे आरक्षण मिळवण्यासाठी दलालांकडे आतापासून ‘फिल्डिंग’ लावत असल्याचे दिसून येते.अमरावती जिल्ह्यातील अनेक जण नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहतात. मात्र दरवर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी न चुकता राहत्या घरी येतात. यावर्षीसुद्धा अनेक जण बाहेरगावाहून घरी पोहचले आहेत. दिवाळी साजरी केल्यानंतर परत जाताना रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळत नसल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. हल्ली रेल्वे आरक्षण खिडक्यांवर ‘नो- रुम’ चे फलक लावण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, बंगळूरू, दिल्ली, चैन्नई, अहमदाबाद, हैद्राबाद, बडोदा, कोलकाता, रायपूर, भिलाई, भोपाल, नाशीक आदी शहरांत परतीच्या प्रवासाला कशाने जावे हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी अनेकांनी कुटुंबासह घर गाठले आहे. अमरावती जिल्ह्यातून मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली येथे नोकरी, व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. दिवाळी साजरी करण्यासाठी अनेक जण घरी पोहचले आहेत. मात्र ५ नोव्हेंबरपर्यंत रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नसल्याने दिवाळी साजरी करण्याऐवजी परतीच्या प्रवासाचे तिकीट आरक्षण मिळविण्याची लगबग सुरु झाली आहे. मुंबई, पुण्याचे आरक्षण नो- रुम दाखवत असल्याने किमान तात्काळचे रेल्वे आरक्षण कसे मिळेल, याचे नियोजन उत्सवासाठी आलेले प्रत्येक जण करीत असल्याचे आहे. मुंबई, पुणे जाण्यासाठी बऱ्याच रेल्वे गाड्या आहेत. मात्र एकाही रेल्वेचे आरक्षण उपलब्ध नाही, हे वास्तव आहे. वातानुकूलित, व्दितीय श्रेणी, तृतीय श्रेणीचे आरक्षण मिळत नसल्याचे रेल्वे आरक्षण खिडक्यांवर दिसून येते.अमरावती- मुंबई एक्सप्रेस, हावडा- कुर्ला एक्सप्रेस, हावडा- मुंबई मेल, नागपूर- पुणे स्पेशल ट्रेन, हावडा- पुणे, हटिया- पुणे, हावडा- पुणे, हटिया-पुणे, गोंदीया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस, हावडा- पुणे आझाद हिंद एक्सप्रेस, अमरावती- पुणे, नागपूर- पुणे गरीबरथ, नागपूर- पुणे, बिलासपूर- पुणे, नागपूर- मुंबई स्पेशल ट्रेन, विशाखापट्टनम् -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, हटिया- एलटीटी, हटिया- सीएसटी सुपर फास्ट, हावडा- मुंबई गितांजली, हावडा- मुंबई मेल, हावडा-सीएसटी स्पेशल ट्रेन, हावडा- कुर्ला शालीमार एक्सप्रेस, हावडा- एलटीटी सुपर डिलक्स, अमरावती - मुंबई एक्सप्रेस तसेच चैन्नई, कोलकात्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण उपलब्ध नसल्याची माहिती तिकीट बुकिंग करणाऱ्यांकडून मिळत आहे.२६ आॅक्टोबर रोजी अमरावती- मुंबई एक्सप्रेसचे ९०० वेटींग तर गोदिंया - मुंबई विदर्भ एक्सप्रेसचे ६०० वेटींग आरक्षण तिकीट निघाले आहे. त्यामुळे मुंबई, पुण्याकडे रेल्वेने जाणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागेल, हे चित्र रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाचे आहे.