शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

राजुराबाजारला पाणी टंचाईच्या तीव्र झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 00:18 IST

राजूराबाजारसह परिसरातील ११ गांवाना पाणीपुरवठा व्हावा म्हणून कोट्यवधी रूपये खर्च करून तयार केलेली ११ गाव

११ गावे योजना कुचकामी : १५ पासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण वरूड : राजूराबाजारसह परिसरातील ११ गांवाना पाणीपुरवठा व्हावा म्हणून कोट्यवधी रूपये खर्च करून तयार केलेली ११ गाव ग्रामीण पाणीपुरवठा योजना पूर्णत: कुचकामी ठरली आहे. राजुराबाजार गावांत उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवत आहेत. यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा उद्रेक झाला असून ही योजना राजुराबाजार ग्रापंला हस्तांतरित करण्याची मागणी पूर्ण न झाल्यास १५ मार्चपासून उपोषणाचा इशारा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. ११ गावे पाणीपुरवठा योजनेचे सद्यस्थितीत तीनतेरा वाजले आहेत. १० गावे योजनेंतर्गत पाणी घेत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राजुराबाजार येथील पाण्याची भीषण समस्या लक्षात घेता ही योजना राजुराबाजार ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्याची मागणी होत आहे. याची पूर्तता न झाल्यास १५ मार्चपासून बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा सरपंच, उपसरपंच तसेच पदाधिकाऱ्यांनी जि.प. सीईओंना सादर निवेदनातून दिला आहे. सद्यस्थितीत राजुराबाजार गावांत तीव्र पाणीटंचाई आहे. ग्रामस्थांना सात दिवसांआड पाणी मिळते. केवळ दोन खासगी बोअर अधिग्रहित करून गावकऱ्यांची तहान भागविली जात असल्यामुळे या योजनेत समाविष्ट इतर १० गावांनी पर्यायी व्यवस्था करून सदर योजनेतून पाणी घेण्यास नकार देऊन तसे ठरावसुद्धा पारित केले. तरीसुद्धा योजनेची विद्युत देयके या ग्रामंपचायतींवरच लादली जात आहेत. सद्यस्थितीत या योजनेतून केवळ राजुराबाजार ग्रामपंचायत पाणी घेत आहे. परंतु पाणीटंचाईचे कायम सावट असल्याने पाणीपुरवठा समितीने ही योजना राजुराबाजार ग्रामपंचायतीला हस्तांतरित करावी, अशी मागणी सरपंच रेखा साबळे, उपसरपंच शिवा शिवहरेसह सदस्यांनी केली आहे. भविष्यात योजनेतून बाहेर पडलेल्या १० गावांना पाणीटंचार्ई भासली, तर नियम व अटींच्या अधीन राहून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासनसुद्धा पत्रामध्ये दिले आहे. योजनेवर विद्युत देयके किंवा इतर सर्व प्रकारची थकबाकी निरंक करून ही योजना हस्तांतरित करण्यास तयार आहे. या योजनेतून पाणी मिळाल्यास राजुराबाजारच्या नागरिकांची तहान भागविणे शक्य होईल. योजनेचे हस्तातंरण न केल्यास सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांसह १५ मार्चपासून वरूड पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आणि जनआंदोलन करण्याचा इशारा जि.प.मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना सादर पत्रातून दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजुराबाजारची तीव्र पाणीटंचाई चव्हाट्यावर आली आहे. (तालुका प्रतिनिधी)