शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
2
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
3
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
4
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
5
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
6
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
7
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
8
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
9
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
10
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
11
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
12
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
13
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
14
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
15
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
16
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
17
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
18
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
19
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
20
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीच्या पांडुरंगा बिगी-बिगी धाव रे,

By admin | Updated: July 1, 2015 00:44 IST

आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.

पाण्यावाचून तळमळते आता सारे गाव रेपावसाची दडी : खरिपाची पेरणी धोक्यातसंजय जेवडे नांदगाव खंडेश्वरआठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. पावसाचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मृग नक्षत्रात सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी सुरु केली. जवळपास १७ ते २२ जूनपर्यंत पावसाची जोमात सुरुवात झाल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीतील बियाणे दडपले गेले, तर काही शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी साचल्याने दलदल निर्माण होऊन ट्रॅक्टरची पेरणी खोळंबली होती. नंतर दोन तीन दिवसांनी शेतकऱ्यांंनी पेरणीला सुरुवात केली. पण २२ जूनपासून पावसाने दांडी मारल्याने आता शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे. तालुक्यात आतापर्यंत ३५ हजार ४२२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. संत्रा बहर फुटलाच नाही. सुरुवातीच्या पावसामुळे संत्रा पिकाने नवती काढली. नंतर पावसाचा खंड व कडक उन्हामुळे संत्राबागेत मृग बहर फुटलाच नाही. वातावरणातील बदल व त्याचा झालेल्या विपरीत परिणामामुळे संत्राबागा फुटल्या नसल्याचे संत्रा उत्पादक रमेश शिरभाते यांनी सांगितले. या तालुक्यात २३ जूनपर्यंत २२२ मी.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यात ७० टक्क्यांवरील पेरणी आटोपली आहे. मात्र मागील ९ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बियाणे उगवलेच नाही. आदी पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी बँकांचे उंबरठे झिजविले. मागील वर्षीच्या दुष्काळामुळे कित्येक शेतकरी बँकेचे घेतलेले पीक कर्ज परत न करू शकल्याने कर्ज पुनर्गठन करण्यासाठी बँकेच्या वाऱ्या सुरु केल्या. महागडे बियाणे व खते जमिनीत पेरली. आणि आता मोड आल्याने दुबार पेरणीचे संकट नशिबी आले आहे, अशी या तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा आहे. किती अंत आता पाहसी देवराया, अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.देवा पांडुुरंगा, जनाबाई सोबत तू गोवऱ्या वेचल्या. गोरोबा काकासोबत माती तुडवून लागून मडकी घडू लागली. चोखा-मेळ्या सोबत ढोरे ओढलीस इतकेच नाही तर सावता मेळ्याचा मळाही राखला. भक्तांच्या हाकेला धावून येतोे हे तुझे ब्रीद असताना या दिन बळीराजाची आर्त हाक तुला ऐकू कशी येत नाही? आषाढी एकादशीला पंढरीची वारी घडावी म्हणून कित्येक वारकरी शेतकरी पेरणी आटोपताच तुझ्या चरणावर मस्तक टेकवण्यासाठी पंढरपूरला येतात. आता तर शेतकऱ्यांकडे असलेले सारे बी-बियाणे शेतात पेरले. पाण्यावाचून बियाण्यांचे अंकुर जळू लागले आहेत. वाढलेले मजुुरीचे दर, महागडे बियाणे व रासायनिक खते या बाबीमुळे आधीच जेरीस आलेला शेतकरी आता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. भकास व आशाळभूत नजरेने आकाशातील ढगाकडे पाहत आहेत. कित्येक शेतकऱ्यांनी आता पेरणीही थांबविली आहे.प्रखर उन्हामुळे अंकुर जळू लागलेप्रभाकर भगोले चांदूररेल्वेतालुक्यात पावसाचे प्रमाण अल्प असले तरी दोन दिवसांच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी ४० टक्के पेरणी केली. परंतु गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेले सोयाबीन, कापूस, तूर पावसाअभावी व प्रखर उन्हामुळे कोंब येऊन सुकू लागले आहे. मागील वर्षी अतिपावसाने खरीप पिकाला जबर तडाखा बसून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. परंतु याही वर्षी झालेल्या नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली. परंतु पाऊसच गायब झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. आजपर्यंत सोयाबीन ५८७२ क्विंटल, कापूस १७९ क्विंटल, तूर १८० क्विंटल, ज्वारी ३१ क्विंटल, मूग ४ क्विंटल बियाण्यांची विक्री झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. कृषी विभागाचा ग्रामीण भागातील कृषी सहकाऱ्यांकडून झालेल्या २४ जूनच्या अहवालानुसार सोयाबीन पेरणी १२५६.६० क्विंटल, तूर २८४-८० क्विंटल, कापूस ५२६-५० क्विंटल पेरणी झाल्याची माहिती कृषी खात्याने दिली.