शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पाठयपुस्तके आता रद्दीऐवजी दप्तरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:30 IST

अमरावती : वर्ष सुरू झाले की, नवीकोरी पुस्तके विद्यार्थ्यांच्या दप्तरात दिसतात आणि वर्ष संपले की, तीच पुस्तके रद्दीत गेल्याचे ...

अमरावती : वर्ष सुरू झाले की, नवीकोरी पुस्तके विद्यार्थ्यांच्या दप्तरात दिसतात आणि वर्ष संपले की, तीच पुस्तके रद्दीत गेल्याचे दिसून येतात. मात्र, हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने आता पुस्तकांचा पुनर्वापर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे जिल्ह्यात लाखो पुस्तके वापरात येणार असल्याने यात लाखो रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे.

सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी झाल्यानंतर २००९ पासून राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी संस्थांच्या पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पाठपुस्तके वाटप केली जातात. विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण हा त्यामागील उद्देश आहे. या योजनेत सुमारे लाखाेच्या संख्येने पुस्तकांचे वाटप केले जातात. यापोटी लाखो रुपयांचा खर्च दरवर्षी केला जातो. विशेष म्हणजे एका पाठ्यपुस्तकाचा संच विद्यार्थ्यांनी चांगला वापरल्यास दोन ते तीन वर्षे सहज उपयोगात येतो. मात्र, यापूर्वी या पुनर्वापरावर विशेष लक्ष न दिल्याने दरवर्षी नवी पुस्तके वाटपाची योजना सुरू आहे.

बॉक्स

पुनर्वापराचा निर्णय

शिक्षण विभागाने पर्यावरणाचे संवर्धन आणि कागदाची बचत करण्यासाठी एकदा वापरलेल्या पाठपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जतनासाठी वापर कमी करणे आणि पुनर्वापर करणे ही संकल्पनाही या माध्यमातून रुजविली जावी, हा यामागील उद्देश आहे.

बॉक्स

प्रायोगिक तत्त्वावर निर्णय

यापुढे आता विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पाठपुस्तकांपैकी ज्यांची पुस्तके योग्यरीतीने जपवणूक करून सुस्थितीत ठेवलेली आहे अशी पुस्तके संकलित करून पुढील वर्षी विद्यार्थ्यांना वाटावीत, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जून २०२१ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडे याची जबाबदारी दिलेली आहे. यावषी प्रायोगिक तत्त्वावर या उपक्रमातून किती पाठपुस्ते जमा होतील. तसेच विद्यार्थी किंवा पालकांचा किती प्रतिसाद मिळतो, यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

कोट

यासंदर्भात शासन पातळीवरून पत्र मिळाले आहे. सदर पत्रातील सूचनेप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल.

- ई.झेड.खान,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)