शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद
2
पुश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
3
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
4
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
5
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
6
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
7
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
8
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
9
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
10
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
11
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
12
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
13
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
14
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
15
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
16
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
17
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
18
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
19
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
20
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
Daily Top 2Weekly Top 5

नव्या नियमांमुळे घरबांधणीला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:16 IST

अमरावती : शहराच्या धर्तीवर गावांचा नियोजनबद्ध विकास व्हावा बांधकाम मंजुरीची प्रक्रिया सुटसुटीत होण्यासाठी नव्या बांधकाम प्रणालीचा उपयोग होणार आहे. ...

अमरावती : शहराच्या धर्तीवर गावांचा नियोजनबद्ध विकास व्हावा बांधकाम मंजुरीची प्रक्रिया सुटसुटीत होण्यासाठी नव्या बांधकाम प्रणालीचा उपयोग होणार आहे. परवानगीची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ झाल्याने गेल्या दहा वर्षांत विनापरवाना बांधकामांचे ग्रामीण भागात पेव फुटले होते. आता ग्रामपंचायत स्तरावरच ३२०० चौरस फुटांपर्यंत परवानगी मिळाल्याने वित्तपुरवठा सुलभ होऊन ग्रामीण भागातील घरबांधणीला गती मिळणार आहे.

ग्रामीण भागातील गावठाण आणि सातबारा बांधकाम परवानगीचे अधिकार यापूर्वी त्या-त्या गावातील जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींना होते अधिकाधिक एक महिन्यात २५० रुपयाची शुल्क भरून परवानगी मिळत होती. २०११ ला सातबारा आणि २०१५ पासून सर्व ग्रामीण भागातील बांधकाम परवानगीचे अधिकार नगररचना विभागाकडे गेले. येथील वेळखाऊ आणि किचकट प्रक्रिया जाचक अटींमुळे घर बांधण्यासाठी परवानगी ग्रामस्थांसाठी दिव्य ठरत होते. बांधकाम परवानगी मिळत नसल्याने ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळत नव्हते. शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे अनेकांनी घरबांधणी अर्ध्यावर सोडलेली. काहींनी लांबणीवर टाकली ज्यांना इतरत्र पैशांची उपलब्ध होती त्यांनी परवानगी न घेताच बांधकामे केली. परिणामी ग्रामीण भागातील घरबांधणीला मरगळ आली होती. नव्या बांधकाम प्रणालीमुळे वित्तपुरवठा सुलभ होणार असल्याने घरबांधणीला गती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बॉक्स

बांधकाम परवानगीचे हेलपाटे आता थांबणार

नगरविकास विभागाचे जिल्ह्यात एकच कार्यालय असल्याने कामाचा निपटारा होत नव्हता गेल्या दहा वर्षांपासून हजारो प्रस्ताव नगररचना विभागात प्रलंबित आहेत नगररचनाकडून गरजूंच्या आर्थिक पिळवणूक की ज्या तक्रारी वाढल्या होत्या खाबूगिरी जाचक अटी वेळखाऊ प्रक्रिया यामुळे बांधकाम परवानगी नकोच, अशी ग्रामस्थांची भावना होती. नव्या प्रणालीमुळे घरबांधणी सोपी होणार आहे.

कोट

बांधकाम परवानगी मिळवणे त्रासदायक झाले होते. त्यामुळे लोक अजिजीला आले होते. या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. लोकांना घर बांधण्यासाठी कर्ज मिळेल नव्या नियमांत शुल्काचा उल्लेख असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर पडेल. बेकायदेशीर बांधकामावर ग्रामपंचायतीला लक्ष ठेवणे सोपे होईल.

रवींद्र मुंदे

जिल्हा परिषद सदस्य