शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’साठी नव्या एजन्सीचा शोध

By admin | Updated: March 30, 2017 00:13 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ कामांसाठी नव्या एजन्सीला शोध चालविला आहे.

निविदा काढल्या : ‘माइंड लॉजिक’चा आॅनलाईन निकाल प्रक्रियेला नकारअमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ कामांसाठी नव्या एजन्सीला शोध चालविला आहे. त्याकरिता निविदा प्रक्रिया युद्धस्तरावर राबविण्यात आली आहे. उन्हाळी परीक्षांचे आॅनलाईन निकाल घोषित करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने कंबर कसली आहे.विद्यापीठाने अभियांत्रिकी, विधी व फार्मसी अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये आॅनलाईन प्रणालीचा अवलंब केला आहे. त्याकरिता बंगळूरु येथील ‘माइंड लाजीक’ या एजन्सीची मदत घेतली होती. परंतु अभियांत्रिकी व तांत्रिकी परीक्षांचे ‘एन्ड टू एन्ड’ नियमन करणाऱ्या एजन्सीने निकाल प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे पत्र परीक्षा मंडळाचे संचालकांना दिले आहे. त्यामुळे उन्हाळी परीक्षांचे निकाल आॅनलाईन घोषित झाले पाहिजे, यावर कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांचा भर आहे. दरम्यान प्रायोगिक तत्वावर अभियांत्रिकी, तांत्रिक व फार्मसी अभ्यासक्रमांच्या परीक्षा प्रक्रिया आॅनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांकडून अर्ज, शुल्क मागविणेसोबत प्रश्नपत्रिका, परीक्षा केंद्रावर आॅनलाईन पाठविणे, उत्तर पत्रिकांची आॅनलाईन तपासणी तसेच आॅनलाईन निकाल घोषित करण्याचा कंत्राट ‘माइंड लॉजीक’ एजन्सीकडे सोपिवण्यात आला होता. मात्र या तिन्ही अभ्यासक्रमांचे आॅनलाईन निकाल वेळेपूर्वी लावण्यात एजन्सीला शक्य झाले नाही. त्यामुळे येत्या उन्हाळी परीक्षांचे परीक्षा नियमन न करण्याबाबतचे पत्र ‘माइंड लॉजीक’ने विद्यापीठाला दिले आहे. दरम्यान सर्वच अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल आॅनलाईन करण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. नव्याने ज्या एजन्सीकडे परीक्षांचे ‘एन्ड टू एन्ड’ कामे सोपविली जाणार त्याच एजन्सीसोबत येत्या उन्हाळी परीक्षांचे आॅनलाईन निकाल घोषित करण्याबाबतचा करार करण्यासाठी विद्यापीठाने तयारी चालविली आहे. येत्या काही दिवसांत परीक्षांबाबत ‘एन्ड टू एन्ड’ कामे सोपविण्यासाठी नव्या एजन्सीकडे जबाबदारी सोपविली जाणार आहे. कुलगुरु चांदेकर यांनी आॅनलाईन निकालाबाबत गोंधळ निर्माण होणार नाही, त्यासाठी सक्षम एजन्सीचा शोध घेत असल्याची माहिती आहे. विद्यापीठ परीक्षांचे ‘एन्ड टू एन्ड’ कामे ही कोणत्या एजन्सीकडे सोपविते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.जुन्या एजन्सीने परीक्षांचे नियमन शक्य नसल्याबाबतचे पत्र दिले आहे. अभियांत्रिकी, विधी व फार्मसी या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य परीक्षांचे ‘एन्ड टू एन्ड’ कामे सोपविण्यासाठी नव्याने कंत्राट सोपविला जाणार आहे. त्याकरिता निविदा प्रक्रिया राबविली आहे. अंतिम निर्णय कुलगुरु घेतील.- जयंत वडतेसंचालक, परीक्षा मंडळ विद्यापीठ