शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगातही मावेना कार्यकर्ते

By admin | Updated: December 13, 2015 00:14 IST

१९८६ च्या डिसेंबरमधील गोष्ट. ७ ते १२ डिसेंबरपर्यंत शरद जोशींनी आंदोलनाची हाक दिली.

जगदीश नाना बोंडे : आठवणींचे वादळअमरावती : १९८६ च्या डिसेंबरमधील गोष्ट. ७ ते १२ डिसेंबरपर्यंत शरद जोशींनी आंदोलनाची हाक दिली. कापसासाठी लाखो पोशिंदे रस्त्यावर उतरले. राज्याच्या विविध ठिकाणची कारागृहे शेतकरी, शेतमजुरांनी हाऊसफुल्ल झाली. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त. मुंगीलाही पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल, अशी स्थिती. वर्धा जिल्ह्यातील वरूड रेल्वे स्टेशन ‘लामबंद’! सारे काही झुगारून गनिमी काव्याने तब्बल ४० हजार लोक १२ डिसेंबरला येथे पोहोचले. आता पोलीस लाठीमार करणार, अशी स्थिती. अंगावर काटाही उमटला. मात्र साहेबांच्या नेतृत्वापुढे नमते घेऊन सर्वांनाच जेलमध्ये टाकण्यात आले आणि त्या दिवसापासून शरद जोशींशी वैचारीक संबंध जुळलेत ते आजतागायत. शरद जोशींच्या खांद्याला खांदा लावून अमरावती तथा विदर्भाचे नेतृत्व म्हणून पुढे आलेले जगदिश नाना बोंडे सांगत होते. त्यांच्या आठवणींचे वादळच इतके व्यापक की ते शमतच नाही.‘शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळविणे, हा माझा श्रमसिद्ध हक्क आहे’, अशी हृदयभेदी घोषणा शरद जोशी यांनी १९८४ ला अमरावतीमध्ये झालेल्या लाखोंच्या सभेत केली. त्यानंतर शेतीचे अर्थकारण समजायला लागले, अशी आठवणही शेतकरी संघटनेचे विदर्भप्रमुख असलेल्या जगदीश नाना बोंडे यांनी सांगितली. (प्रतिनिधी)