शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मजीप्राचे ‘जीवन’ धोक्यात

By admin | Updated: June 1, 2016 00:50 IST

येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ग्राहकांकडे ८५ कोटी रुपये पाणी पुरवठा देयकांचे थकबाकी असल्याने या यंत्रणेचे ‘जीवन’ धोक्यात आले आहे.

८५ कोेटी थकबाकी : महापालिकेवर चढविला बोझाअमरावती : येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ग्राहकांकडे ८५ कोटी रुपये पाणी पुरवठा देयकांचे थकबाकी असल्याने या यंत्रणेचे ‘जीवन’ धोक्यात आले आहे. परिणामी नागरिकांंना पाणी पुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास मजीप्राला गासे गुंडाळावे लागेल, असे संकेत आहे.राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने मराठवाड्यात आठवड्यातून एकदा तर अकोला, वाशिम, बुलडाणा आदी जिल्ह्यांमध्ये तीन ते चार दिवसांतून एकदा नळाद्वारे पाणी पुरवठा आजही सुरु आहे. मात्र यावर्षी उन्हाळ्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमरावती शहरवासियांना पाणी टंचाईची जाणीव होऊ दिली नाही. नियमित पाणी पुरवठा करुन नागरिकांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला. परंतु मजीप्राचे पाणी पुरवठ्याचे सुमारे ८५ कोटी रुपये देयकांचे थकबाकी असल्याने ते वसूल करताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोट्यवधी रुपये थकबाकी असल्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत पायाभूत सुविधा पुरविणे मजीप्राला अशक्य होत असल्याचे वास्तव आहे. बडनेरा शहरात कालबाह्य झालेले जलकुंभ जमिनदोस्त करण्यात आले. त्यामुळे पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर झाली आहे. मजीप्राकडे निधी उपलब्ध असता तर पायाभूत सुविधांना प्राधान्य देता आले असते असे कार्यकारी अभियंता प्रशांत भामरे यांनी सांगितले. पाणी पुरवठा देयकांच्या थकबाकीसाठी आता कृ ति आराखडा तयार करण्यात आला आहे. यापूर्वी महापालिका प्रशासनाकडे स्टॅन्ड पोस्ट आणि पाणी पुरवठ्याशी संबंधित देयकांचे ३५ कोटी रुपये थकबाकी असल्यामुळे महसूल विभागाने बोझा चढविला आहे. अद्यापही महापालिकेने देयकांची रक्कम अदा केली नाही. मात्र ही रक्कम वसूल करण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधला जात आहे. तसेच २५ हजार ग्राहकांकडे सुमारे ५० कोटी रुपये देयकांचे थकीत आहे. ५० कोटी रुपये ही रक्कम वसूल करण्यासाठी जप्तीपूर्वीची नोटीस बजावण्याचे ठरविले आहे. १० दिवसात ही रक्कम ग्राहकाने भरली नाही तर पाणी पुरवठा बंद करुन महसूल विभागाकडे कायदेशीर कारवाईसाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्याकरिता स्वतंत्र एजन्सी नेमण्यात आल्याचे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.