शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळाच्या गोदामात व्यापाऱ्यांचा मका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:39 IST

पान ३ चे लिड धारणी : आदिवासी विकास विभागाद्वारे आदिवासी क्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि त्यांची ...

पान ३ चे लिड

धारणी : आदिवासी विकास विभागाद्वारे आदिवासी क्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि त्यांची आर्थिक उन्नती साधावी, या उदात्त हेतूने आदिवासी विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. मात्र, स्थापनेपासूनच महामंडळावर व्यापाऱ्यांचे वर्चस्व दिसून येते. आता महामंडळाच्या गोदामात शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचा मका भरला असल्याने ते वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

धान्यमाल खरेदी करताना जाणून बुजून विलंब करणे आणि शेतकऱ्यांच्या मालाला महिनोगिणती चुकारा ना देणे या पद्धतीमुळे आदिवासी विकास महामंडळ शेतकऱ्यांसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. आदिवासी विकास महामंडळातर्फे सध्या खरीप हंगामातील मका, ज्वारी, बाजरी आणि इतर पिकांची खरेदी सुरू झाली आहे. पैशांची चणचण, सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड व रबी हंगामातील पेरणीकरिता पैशांची नितांत आवश्यकता असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल अत्यंत कमी दरात व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. नंतर तोच शेतमाल शेतकऱ्यांचा असल्याचे भासवून आदिवासी विकास महामंडळाला विकला जातो. अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू आहे.

आदिवासी विकास महामंडळातर्फे खरेदी केंद्रे विलंबाने सुरू केले जाते. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा फटका बसतो. महामंडळातर्फे घोषित केलेल्या दरापेक्षा निम्म्या दरात व्यापाऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला जात आहे. नंतर तोच शेतमाल आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत संगणमताने बोगस सातबाराच्या आधारे खरेदी केला जात असल्याचा प्रकार दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पहावयास मिळत आहे.

सातबाऱ्यातील पेरेपत्रकात तफावत

ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रात सातबारे दाखल केले, त्याप्रमाणे पेरणी केलेले धान्य आणि प्रत्यक्ष उत्पादनार्प्रचंड तफावत आहे. जवळच्या लोकांच्या सातबाराच्या आधारे आदिवासी विकास महामंडळात धान्य खरेदी सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आजही नंबरच्या प्रतीक्षेत असून त्यांचा माल घरातच पडून आहे. मात्र, व्यापाऱ्यांचे ट्रक गोदाम गाठत असल्याचे चित्र आहे. तलाठ्याने खरीप हंगामातील पेरणीपत्रक ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत भरणे आवश्यक असते. प्रत्यक्ष पाहणी न करता घरबसल्या पद्धतीने पेरेपत्रक लिहिण्यात येत असल्यामुळे प्रत्यक्ष पेरा आणि सातबारातील वर्णनात मोठी तफावत पहावयास मिळत आहे.