शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटपास राष्ट्रीयीकृत बँकांचा ‘खो’

By admin | Updated: June 5, 2015 00:31 IST

यंदाचा खरीप हंगाम चार दिवसांवर आला आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, पेरणीसाठी पीककर्जाची नितांत गरज आहे.

खरीप चार दिवसांवर : कर्ज पुनर्गठनही नाही, उद्दिष्टांच्या १२ टक्केच वाटपगजानन मोहोड अमरावतीयंदाचा खरीप हंगाम चार दिवसांवर आला आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, पेरणीसाठी पीककर्जाची नितांत गरज आहे. शासनानेही शेतकऱ्यांच्या कर्जाचे ५ वर्षांसाठी पुनर्गठन करून नव्याने कर्ज द्यावे, असे आदेश दिले आहेत. परंतु ३० मे रोजीचा पीककर्ज वाटपाचा अहवाल पाहता जिल्हा सहकारी बँकेशिवाय अन्य राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँकांनी पीककर्ज वाटपाला हरताळ फासल्याचे दिसून येते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकूण उद्दिष्ट्यांच्या ५३ टक्के पीक कर्जाचे वाटप मे अखेर केले आहे. त्या तुलनेत राष्ट्रीयीकृत बँका १२ टक्के व ग्रामीण बँकांनी २६ टक्के कर्जवाटप केले आहे. हे वाटप जिल्हा सहकारी बँकेच्या पीककर्ज वाटपाच्या निम्म्याच प्रमाणात आहे. खरीप २०१५-१६ करिता १६९५ कोटी ४४ लाख इतका पीककर्ज वाटपाचे लक्षांक आहे. या तुलनेत ४९ हजार ८०६ शेतकऱ्यांना ४४१ कोटी ६७ लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. हे एकूण उद्दिष्ट्यांच्या २६ टक्के इतके आहे. जिल्हा सहकारी बँकेला खरिपासाठी ५६३ कोटी २७ लाख रूपयांचे लक्षांक असताना ३० मे पर्यंत ३५ हजार ७७५ शेतकऱ्यांना ३०० कोटी ५६ लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे, हे लक्षांकाच्या ५३ टक्के आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना खरिपासाठी ११२२ कोटी ९८ लाख रूपयांचा लक्षांक आहे. त्या तुलनेत १३ हजार ७११ शेतकऱ्यांना १३८ कोटी ७१ लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. १५ जूनपर्यंत कर्जाचे पुनर्गठनमागील वर्षातील कर्जाचे पुनर्गठन पाच वर्षांसाठी १५ जूनच्या आत करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाचे आदेश तसेच नाबार्ड, भारतीय रिझर्व बँक यांचे निर्देश आहेत. परंतु बँकांची सध्याची प्रगती पाहता पुनर्गठन प्रक्रिया रखडण्याची चिन्हे आहेत.जिल्हा सहकारी बँकेची खरीप कर्ज वाटपाची सुरूवात एप्रिलपासून होते. त्या तुलनेत कमर्शिअल बँकांचे कर्जवाटप मे महिन्यापासून म्हणजेच उशिरा होते. त्यामुळे हा कर्जवाटपाचा फरक आहे. मागील कर्जाचे पुनर्गठन १५ जूनपर्यंत करण्यात येणार आहे. - गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)जिल्हा बँका सोसायट्यांमार्फत कर्जवाटप करतात. त्यामुळे एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांना कर्ज मिळते. कमर्शिअल बँका एकेका शेतकऱ्याला कर्ज देतात. शेतकरी स्वाक्षरी देत नाहीत. त्यामुळे पुनर्गठनास विलंब होत आहे. -अनंत खोरगडे, व्यवस्थापक, अग्रणी बँक.