शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुला-मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले

By admin | Updated: July 11, 2015 00:34 IST

अल्पवयीन मुले-मुली प्रेमप्रकरणातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून अद्यापपर्यंत शहरातील १६ जण बेपत्ता आहेत.

अद्याप १६ जण बेपत्ता : आॅपरेशन मुस्कान मोहिमेतून शोध सुरु
वैभव बाबरेकर अमरावती
अल्पवयीन मुले-मुली प्रेमप्रकरणातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून अद्यापपर्यंत शहरातील १६ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध आॅपरेशन मुस्कान मोहिमेतून पोलीस विभाग घेत आहेत.
शहरातील १८ वर्षांखालील मुलांमध्ये प्रेमाचे वारे वाहू लागल्याने त्यांचे पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे गुन्ह्यासंदर्भात तक्रारीवरून लक्षात येत आहे. कमी वयात मुले-मुली आधुनिक तत्रंज्ञानाच्या माध्यमातून लैंगिक विषयाची माहिती घेत आहेत. त्या अनुभवातून अल्पवयीन प्रेमाच्या आहारी जात असल्याचे मनोरुग्ण तज्ज्ञ अमोल गुल्हाने यांचे मत आहे.
शहरात अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनासोबत पालकवर्गही हतबल झाले आहेत. मागील दोन वर्षांत ८० अल्पवयीन पळून गेल्याच्या तक्रारी पोलीस विभागाला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीवरून पोलीस विभागाने अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी ६४ अल्पवयीनांचा शोध पोलीस विभागाने घेतला असून १६ जणांचा शोध सुरू आहे. यातील बहुतांश अल्पवयीन प्रेमप्रकणातून पळून गेल्याचे पोलीस विभागाच्या निदर्शनास आले आहे. बेपत्ता १६ अल्पवयीनांमध्ये १२ मुली व ४ मुलांचा सहभाग आहे.
साधारणत: १८ वर्षांवरील मुलां-मुलीमध्ये प्रेमप्रकरणे कायद्यानुसार ग्राह्य धरले जाते. मात्र, अल्पवयीनांतही प्रेम प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर आवर घालण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवीत आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानातून अनुभव
पूर्वीच्या काळात अल्पवयीनांना लैंगिक व्यवहाराची माहिती उशिरा कळत होती. मात्र, आताच्या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, टीव्ही, इंटरनेटच्या माध्यमातून लवकरच लैंगिक व्यवहाराबाबत अल्पवयीन मुले-मुली ज्ञात होत आहेत. त्यामुळे आताच्या पिढीतील मुलांं-मुलींचे हार्मोन्सचा विकास लवकरच होत आहे. परिणामी अल्पवयीनांमध्ये म्यॅचुरिटी येत असल्याचे मनोरुग्ण तज्ज्ञांचे मत आहे.
पाल्यांना भविष्याची जाणीव करुन देणे योग्य
पालकांनी आपल्या मुलांना भविष्यातील जबाबदारीची जाणीव करुन देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. मुलांना भविष्यात काय करायचे आहे. पुढे त्यांना कशा प्रकारे कुटुंबीयांंची जबाबदारी सांभाळायची आहे. आपण कुठे चुकत आहेत आदींची मुला-मुलींना जाणीव करून देणे आजच्या काळाची गरज आहे. आताच्या चुकीमुळे आपल्याला पुढील जीवनात पश्चातापाची वेळ येऊ नये याकरिता पालकांनी पाल्याना वारंवार जबाबदारीची आठवण करून देणे गरजेच्े असल्याचे मत मनोरुग्ण तज्ज्ञ अमोल गुल्हाने यांनी सांगितले.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अल्पवयीनांना मोबाईल, टीव्ही व इंटरनेट सारख्या माध्यमातून लैंगिक व्यवहाराची सर्व माहिती मिळते. त्यामुळे मुलांमध्ये म्यॅच्युरिटी लवकरच येत आहे. अल्पवयीनांना पुढील जीवनातील जबाबदारीची जाणीव नसते. पालकांनी मुलांना वारंवार याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. त्यांना चांगले संस्कार देणे गरजेचे आहे.
- अमोल गुल्हाने, मनोरुग्ण तज्ज्ञ.

आॅपरेशन मुस्कान मोहिमेतून मुलां-मुलींची शोध मोहीम सुरु आहे. यामध्ये अधिकाधिक मुल-मुली प्रेमप्रकरणातून पळून गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी बहुतांश मुलांचा शोध घेण्यात आला असून त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.
- रियाजुद्दीन देशमुख, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा.