शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्राकडून दिली जातेय अपुरी सेवा

By admin | Updated: January 18, 2015 22:29 IST

चांदूररेल्वे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अद्यापही आरोग्याच्या बाबतीत ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेशी सोयी मिळत नाहीत. आरोग्य विभागावर लाखोंचा खर्च होत

प्रभाकर भगोले - चांदूररेल्वेचांदूररेल्वे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अद्यापही आरोग्याच्या बाबतीत ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेशी सोयी मिळत नाहीत. आरोग्य विभागावर लाखोंचा खर्च होत असताना ग्रामीण भागातून रोगराईचे उच्चाटन होण्याऐवजी ती वाढतच असल्याची बाब या सभेत उघड झाली. अपेक्षा होमिओ सोसायटीच्यावतीने आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सभा तालुक्यातील आमला (विश्वेश्वर) प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थान पंचायत समिती सदस्य नीलिमा होले होत्या. रबडे, मनू वरणे, आमला ग्रामपंचायत सदस्य सविता कुंभरे, चांदूरवाडीच्या सुनंदा डोेंगरे, आमदोरीचे अमोल राऊत, तालुका समन्वयक सोमेश्वर चांदूरकर, प्रभाकर भगोले उपस्थित होते. प्रारंभी वेणू वरणे यांनी सभेतील विषयांचे वाचन केले.प्रत्येक गावात नेमून दिलेल्या आशा स्वयंसेविकांनी त्यांच्या अडचणी विशद केल्या. औषधांचा पुरवठा होत नसल्याची त्यांची ओरड होती. तरोडा येथील पारधी वसाहतीत आरोग्य सेवक-सेविका गेल्या नाहीत. बासलापूरच्या आशा सेविका आर्वी येथे राहाते. तेथूनच ती बासलापूरचा कारभार पाहते सहा महिन्यांपासून गरोदर महिलांना ग्रामीण भागात आहार बंद आहे जे आरोग्यसेवक ग्रामीण भागात जातात त्यांचे जवळ ओळखपत्र नाही. आरोग्य निधी दोन महिन्यांपासून नाही. सालोरा खुर्द या गावातील नागरिकांना पाण्याचे नमुने तपासणीचा अहावलाची माहिती होत नसल्याने महिलांचे आजार वाढण्यास दूषित पाणीच कारणीभूत ठरत आहे, असा समज झाल्याने त्याबाबतचे निराकरण आरोग्यसेवकांकडून होत नाही. मांजरखेड (कसबा), जळका पटाचे गावात एनएएम कडून औषधी पुरवठा होत नाही. आरोग्य सेवकाला मांजरकेड (कसबा) येथे शासकीय निवासस्थान असताना निवासात राहत नाही. सालोरा, तरोडा गावात बालमृत्यू होत असल्याने आरोग्य विभागाची यंत्रणा कुचकामी ठरल्याची बाब आजच्या सभेत उघड झाली.ही सभा दर तीन महिन्यांनी होत असली तर या सभा ग्रामपंचायत स्तरावर व्हाव्यात, असे मत आजच्या सभेत व्यक्त केले. आरोग्य विभागाच्या सोई सुविधांचा अभाव असला तरी नागरिकांची जनजागृती होणे गरजेचे आहे, असे सभे अंती ठरविण्यात आले. सेवेतील ही अनियमितता दूर करण्याची मागणी होत आहे.