शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींचे लक्ष दुर्गम शाळांच्या निश्चितीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे यावर्षी बदल्या होणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असली तरी जिल्ह्यातील दुर्गम शाळांच्या ...

अमरावती : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे यावर्षी बदल्या होणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असली तरी जिल्ह्यातील दुर्गम शाळांच्या निश्चितीकडे प्राथमिक शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत शाळा निश्चिती समितीची लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. दरम्यान शिक्षकांच्या बदल्यांचे अधिकार पुन्हा सीईओकडे आले आहेत.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन राज्यपातळीवर होत आहे. यामध्ये अंशत: बदल करण्याचा अधिकार झेडपी सीईओंना नव्हता. बदलीत चूक झाल्यास त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या पातळीवर अपील करण्यात येत होते. सध्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यावर्षी होणार की नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. गतवर्षी कोरोनामुळे शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. यंदा तर आता बदल्यांना ३० जून पर्यत स्थगिती देण्यात आली आहे. असे असले तरी यंदा मात्र शिक्षकांच्या बदल्या बाबत ग्रामविकास विभाग नेमकी काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्यातील शिक्षकांची लक्ष लागून राहिले आहे. शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया करण्याची वेळ आल्यास त्यासाठी जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील दुर्गम शाळांची निश्चिती करावी लागणार आहे. अवघड क्षेत्रातील शाळा ठरवतांना संबंधित शाळा ही नक्षलग्रस्त अथवा पेसा क्षेत्रात असणाऱ्या गावातील असावी, वार्षिक सरासरी पर्जन्यमान २००० किलोमीटरपेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे गाव, महसूल विभागाकडील माहितीनुसार हिंस्त्र वन्य प्राण्यांचा उपद्रव असणाऱ्या जंगलव्याप्त प्रदेश, संबंधित उप वनसंरक्षक यांच्या अहवालानुसार वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असणारे गाव तसेच वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव रस्त्याने न जोडलेल्या शाळा बस रेल्वे इतर सार्वजनिक वाहतूक संवाद शाळेचा प्रदेश संबंधित महाप्रबंधक बीएसएनएल यांच्या अहवालानुसार डोंगरी भाग प्रदेश नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय राज्य महामार्ग पासून दहा किलोमीटर पेक्षा जास्त दूर असणाऱ्या गावातील प्राथमिक शाळा या अवघड क्षेत्रातील दुर्गम शाळा घोषित करण्यात येणार आहेत. दर तीन वर्षांनी याचे अवलोकन करण्याचे ग्रामविकास विभागाने आदेश दिले आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या ७ निकष यापैकी कोणत्याही ३ निकषात बसणाऱ्या प्राथमिक शाळा या अवघड शाळा होणार आहेत.

बॉक्स

अवघड क्षेत्रासाठी जिल्हास्तरावर समिती

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष समितीचे अध्यक्ष असून उपजिल्हाधिकारी निवडणूक, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे समितीचे सदस्य तर प्राथमिक शिक्षण अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. ही समिती जिल्ह्यातील अवघड शाळा निश्चित करणार आहे.