शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आधी शेतकरी राजकारण्यांच्या कर्जमाफीच्या घोषणांना भुल्ले आणि आता व्याजमाफीलाही मुकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:00 IST

Amravati : मार्चअखेर पीक कर्जाचा भरणा नसल्याने हजारो शेतकऱ्यांना फटका

गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजकारणातील घोषणांच्या आतषबाजीत शेतकऱ्यांची फसगत होत आहे. कर्जमाफी होणार असल्याच्या चर्चेने जिल्हा बँकेच्या १३ हजार नियमित खातेदारांनी ३१ मार्चच्या आत पीक कर्जाचा भरणा न केल्याने त्यांना शून्य टक्के व्याजमाफीला मुकावे लागले. आता ३० जूनपर्यंत ८.७५ टक्के व त्यानंतर थकबाकीदार राहिल्यास ११.७५ टक्के व्याजाचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचे वास्तव आहे.

गतवर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारा उच्चांकी ५५ हजार ३४२ शेतकऱ्यांना ६४७.३० कोटींच्या खरीप पीक कर्जाचे वाटप केले. हे वाटप सरासरीच्या १०४ टक्के होते. प्रत्यक्षात जिल्हा बँकेला ६२० कोटींच्या कर्जवाटपाचा लक्ष्यांक होता. त्या तुलनेत २७.३० कोटींचे जास्त कर्जवाटप करण्यात आले. त्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी व नियमित खातेदारांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिल्याने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला व कर्जवाटपाचा टक्का वाढला होता. 

त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान महाविकास आघाडीद्वारे कर्जमाफीची घोषणा केली व त्याला प्रत्युत्तर देत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनीही कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आल्याने कर्जमाफी द्यावी, यासाठी विविध पक्षांद्वारा आंदोलने होत आहेत. अशा परिस्थितीत कर्जमाफी होणार, या आशेमुळे हजारो शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे हे शेतकरी शून्य टक्के व्याजमाफीला मुकले आहेत.

११.७५ टक्के व्याजाचा भुर्दंड ३० जूनपूर्वी पीक कर्जाचा भरणा न केल्यास खातेदारांना बसणार आहे. १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ खातेदारांना मिळेल.

थकीत कर्जानी वाढला बँकांचा एनपीएजिल्हा बँकेसोबत राष्ट्रीयीकृत बँकांमध्येही हीच परिस्थिती असल्याने थकीत कर्जाचा आकडा फुगत चालला आहे व यामुळे बँकांची आर्थिक कोंडी होत आहे. शिवाय 'एनपीए' देखील वाढत असल्याची वस्तुस्थिती आहे. बँकांचे खातेदार थकबाकीदार असल्याने यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाची गती मंदावणार आहे.

३० जूनपर्यंत व्याजात ३ टक्के सवलत३१ मार्चपर्यंत पीक कर्जाचा भरणा केल्यास शून्य टक्के व्याज सवलत मिळते. त्यानंतर १ एप्रिल ते ३० जून दरम्यान ८.७५ टक्के व्याजाची आकारणी होईल. यामध्ये व्याज सवलत योजनेच्या ३ टक्के व्याज सवलतीचा लाभ मिळतो. त्यानंतर मात्र ११.७५ टक्के व्याजाची आकारणी होते.

जिल्हा बँकेची कर्ज मागणी (लाखात)सभासद खातेदार (चालू) - ५५४१०खातेदारांची रक्कम - ६४७१४थकबाकी खातेदार - ४९३९६थकबाकी रक्कम - ३५४९८.६८

कर्जवसुली (लाखात/३१ मार्च)सभासद खातेदार (चालू) : ४२३८५खातेदारांची रक्कम : ४९५७४.३८थकबाकी खातेदार : ९०५थकबाकी रक्कम : २८४२.०२

"नियमित खातेदारांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा न केल्याने त्यांना शून्य टक्के व्याजमाफीपासून वंचित राहावे लागले. आता १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत ८.७५ टक्क्यांनी व्याज आकारणी होईल."- शंकर कुंभार, जिल्हा उपनिबंधक

"नियमित खातेदारांना पुन्हा एक संधी आहे. त्यांनी ३० जूनपूर्वी कर्जाचा भरणा केल्यास ३ टक्के व्याजाची सवलत मिळेल. त्यानंतर थकीत कर्जावर ११.७५ टक्के व्याजाची आकारणी होईल."- अभिजीत ढेपे, उपाध्यक्ष, जिल्हा बँक

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरीfarmingशेती